Friday, July 9, 2010

एक दिवसचा वारकरी

गेले तीन चार वर्ष मी आणी माझे काही मित्र ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी बरोबर पुणे ते दिवेघाट जवळ जवळ २६ कि.मी. जातो. पहिल्या वर्षी आम्ही दिवे घाट पायथ्या पर्यंत गेलो आणि तेथुन कानिफनाथाचा डोंगर चढलो थोडासा त्रासदायकच होत पण आम्ही ते अंतर चढुन जाऊ शकलो.


२५,२६ किमी नुसत चालण खंरच खुप आवघड आहे. पण या चार वर्षातील अनुभवावरुन नक्कीच म्हणता येईल की माऊलीच्या बरोबर चाललो म्हणजे त्रास कमी होतो. अनेक वयोवृध्द वारकरी टाळ मृंदुगाच्या तालावर नाचताना बघितल की आपण तरुण (त्याच्यापेक्षा) असुन सुध्दा आपण काय करतो!

आज पण मनात एक सुप्त (सुप्त कसली???) इच्छा आहे की पुर्ण वारी चालत करायची बघू माऊलीच्या मनात काय आहेते?

काल माझ्या बरोबर माझा एक दक्षिणेकडील (मराठीत south Indian) मित्र होता, त्याने मला विचारले "what do you mean by "maaULI"?" खंरतर फारच आवघड प्रश्न होता, मी म्हणालो "maaULi means mother" दुस-या मित्रान आणखीन व्याख्या चांगली करत “Beloved mother who take care of children”. "माऊली" या शब्दाचा अर्थ समजुन सांगण खरच खुप आवघड आहे पण समजुन घेणे तितकच सोप.
                                
                                       विट्टल तात्या


                                                                  पुरुषोत्तम जतकर

ओटीवरती विट्टल तात्या टाळ कुटीत बसत असतं
कसं काय विट्टल तात्या म्हणता फक्त हसत असत
गळ्यामध्ये तुळशीमाळा कपाळाला नाम टिळा
अन् हसता हसता मध्येच एकदम मिचकवित एक डोळा
तसे त्यांच्यात पाप नव्हत जीवन अगदी निष्पाप होते
ओठवरचे खुले हास्य ते ही अगदी अमाप होते
सुखासाठी तात्या कधी ओटी सोडून गेले नाहीत
दुःखाचे डोंगर आले पण तात्या त्याला भ्यायले नाहीत
वारक-याला पहाताच क्षणी तात्या त्याच्या पाया पडत
खंर म्हणजे त्याच्यां वाचून त्यांचे काहीच नव्हते अडत
पण तो एक त्याचा भाव होता अंतरीचा ठाव होता
कारण पंढरीच्या वाटेवरच तात्यांचा गाव होता
पंढरीची पायी वारी नियम कधी मोडला नाही
भुकेलेल्या वारक-यास अन्नवाचुन सोडला नाही
एकदा त्यांनी पानामधलीच भिका-याला भाकर दिली
अन् उरली भुक पाणी पिऊन तेवढ्यावरच ढेकर दिली
तात्या आता वृध्द झाले हात पाय अगदीच थकले
पंढरीची वारी चुकेल म्हणून त्यांना आता दुःख झाले
आषाढीचा सोहळा आता तात्यांच्याच घरी भरतो
अन् पांडुरंग दिंडी घेऊन त्यांच्याच घरी वारी करतो

Thursday, June 24, 2010

जुनं ते सोनं

मला कायमच वाटत आपण फक्त जुनं ते सोनं असच म्हणत बसतो. माझ्यात पण हा दोष (का? गुण) आहे.


परवा एका वाहिनीवरुन (मराठीत channel) दुसरीकडं जाताना चुकुन दुरदर्शन लागल. कार्यक्रम होता चित्रहार. आणि मी परत माझ्या लहानपण्यातल्या टि.व्ही. कार्यक्रमात गेलो. चित्रहार मोजुन तिन गाणी, रंगोली रविवारी लवकर उठायच नसताना लवकर उठवणारा कार्यक्रम. चित्रगित मराठी गाण्याचा कार्यक्रम.

किती सुरेख होत जग! आज २४ तास गाण्याचे अनेक channels. पण एक तरी channel आपण अर्धातास बघतो का? संध्याकांळी कार्यक्रम सुरु होतानाचा दुरदर्शनचा लोगो. काय मस्त संगीत होत ते!

सुरभी, करमचंद, तहकिकात, गुल गुलशन गुलफाम, बुनियाद, रामायण,जंगलबुक कितीतरी नाव आजही पटकन सांगता येतात. पण सहा महिन्यापुर्वी संपलेल्या मालिकेच नाव आठवायला २ मिनिट लागतात.

मला पुर्वीचे कार्यक्रम तर सोडाच पण जहिराती पण आवडायच्या. "हमारा बजाज", "और मेरे लिये? पानपराग.", "निरमा", "कैलास जिवन" आणि आश्या कितीतरी आणि आज????????

फलटणला रामाचा रथ देवदिवाळीला निघतो. रथ ठेवायची जागा माझ्या घरापासुन जवळ असल्याने आम्हाला त्याचा अभिमान असायचा. गावात लाईटच वायंरीग रस्त्याच्या कडेने असायच. त्यामुळे रथ यायच्या वेळी लाईट बंद केली जायची. चुकुन रथ शनिवारी किंवा रविवारी आला तर मग चित्रपट चालू असताना लाईट जायची. किती मनस्ताप होयचा त्यावेळी. आज एकाच वेळीस अनेक सिनेमे बघतो, पण एकपण पुर्ण नाही.

मी माझ्या मुलाला नक्की सांगु शकेन "माझ्या लहानपणी टि.व्ही.वर काय कार्यक्रम असायचे! पण तो त्याच्या मुलांना काय सांगेल????"

शेवटी वपू म्हणतात तसं "आठवणी कुठल्या का असेनात त्या वाईटच. सुखाच्या असतील तर त्या वेळी असलेले सुख म्हणून दुःख, किंवा दुःखाच्या असतील तर ते भोगलेले दुःख"

Monday, June 14, 2010

मत्सर

आज बरेच दिवसातून परत काही तरी लिहावस वाटल.


मागच्या महिन्यात मी घराच्या मंडळींबरोबर सहलीला (trip)गेलो होतो. पुर्ण सहली बद्दल लिहावस वाटत होत. पण जमलच नाही. म्हणुन काही किस्सेः

मला कायम दक्षिणेकडील राज्याच्या परिवहन मंडळाबाबत (मराठीत S.T.)  हेवा (हेवा कसला मत्सरच) वाटायचा. किती कमी पैशात किती चांगली सेवा! आमच्या प्रवासात आम्ही श्रीशैलम् वरुन विजयवाडाला आंन्ध्रच्या S.T ने प्रवास केला. आम्हाला बसायला जागा होती आणि बस पण रिकामीच होती. हळूहळू बस भरत गेली. आणि अनेकजण उभे पण राहिले. माझ्या शेजारी एक स्त्री, तिची मुलगी आणि मुलगा आशे उभे होते. अचानक मुलगा खिडकी कडे धावला. लहानपणी मला पण गाडी लागायची, त्यामुळे पुढे काय होणार हे माझ्या लगेच लक्षात आल. पण मुलगा काही खिडकी पर्यत जाऊ शकला नाही. त्यांन उलटी करुन गाडी घाण केली.

त्या बाईन स्वःताच्या bag तुन एक त्या मुलाचा एक शर्ट काढला. सर्व घाण स्वच्छ केली. आणि तो शर्ट खिडकीतुन टाकून दिला.

त्यावेळी मी जर महाराष्ट्रात असतो तर काय झाल असत हाच विचार करत होतो.

आपणच केलेली घाण आपणच स्वच्छ करायला पाहिजे?!. हे प्रवासी, चालक वाहक आणि शासनकर्ते या सर्वानाच लगू होत असाव?!.

Friday, March 19, 2010

रुम ५२

पदवीत्तर (Post graduate) शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. पुण्या घर असल्यामुळे वसतीगृहात (Hostel) राहण्याचा प्रश्र्नच आला नाही. पण २००२-२००४ यावेळेत पुणे विद्यापिठातील वसतीगृह निरीक्षक (Rector) पण मला Hostel वरचा विद्यार्थी समजत असावेत.

रुम ५२ हि विशेष आवडीची रुम. या रुमवरचे अनेक किस्से आहेत (चला ४,५ Blog तरी भरतील).

एप्रिल, मे महिन्यातील दिवस. परीक्षा चालू झाल्या होत्या. "तु रुम वर आलास म्हणजे सगळी मुल आभ्यास करतात. परीक्षाच्या काळात तु रुम वरच रहा" रुमवरचा मित्र. "बंर". उद्या पासुन पेपर सुरु होणार होत्ते. पहिला पेपर "Regression analysis". मी आदल्या दिवशीच रुमवर गेलो. दुपार पासुन सर्वानी अभ्यास पण सुरु केला. ७,८ वाजले असतील. जेवणाचे डब्बे येण्याची वेळ झाली. एका मित्राने पत्ते काढले व डाव लावत बसला. यथावकाश डब्बे पण आले. जेवण झाल्यावर परत अभ्यास सुरु करणार होतोच. पण मगाशी डाव लावणारा तो डाव पुर्ण करत होता. त्याला मदतीला दुसरा मित्र आला. मग डाव लावण्यापेक्षा रम्मी खेळलेली बरी. म्हणुन रम्मीचा डाव सुरु झाला. एकाला दोन, दोनाला तीन आशे सर्वजण बसले (मी सुध्दा). दुसरे दिवशी चहा नाष्टा कोण देणार हे ठरवण्यासाठी. रात्रीचे १२:३० वाजले असतील तेव्हा कुठे डाव संपला. मग सर्वानी लवकर उठुन अभ्यास करयच ठरवंल.

रात्रीचे तीन, साडेतीन वाजले असतील. एका मित्राच्या पोटात दुखाला लागल. त्यान शेजारच्याला उठवल. आणि हळुहळू रुम जागी झाली. त्याच्या पोटात पण भंयकर दुखत असणार. "नाही रे, उद्यापर्यत मी जिवंत राहत नाही" वगरै,वगरै आशी त्याची वाक्य चालू होतीच. सर्व उपाय जे आम्ही करु शकतो ते सर्व करुनही झाले. मित्राचा त्रास वाढतच चालला होता. मग कुणीतरी रिक्षा आणली. रात्री रिक्षा मिळण फार मुश्किल होत. त्याला रिक्षात घातल. कुण्याच्यातरी मागुन आणलेल्या दोन गाड्यावर चौघ. जवळच असण्यार्या रत्ना हॉस्पिटला आम्ही गेलो. डॉक्टरानी तपासल व दाखल करुन घेतल (admit). डॉक्टराना विचारल "काही सिरियस?" "काही नाही उद्या ठीक होईल". तो पर्यत सकाळचे ६ वाजले होते. त्या मित्राच्या आई वडिलाना बोलावल. ते पण घाबरुन ११,१२ पर्यत आले. तो पर्यत आम्ही तिथेच. अभ्यासाचाच उजेड. पण पेपर देयचा ठरवल होतच.

पेपर दिला पण. देवाच्या दयेने आम्हचे टमके बरोबर लागले व आम्ही पास पण झालो. दुसर्या दिवशी त्याला हॉस्पिटल मधुन सोडल पण.

Thursday, March 11, 2010

आणि आम्ही परत फिरलो

आणि आम्ही परत फिरलो


मी त्यावेळी खुपच लहान होतो. माझे आते भाऊ आणि बहिण आमच्याकडे राहला आले होते. ते आले कि दिवस मजेत जायचे. पण ते जायचे त्या दिवशी भंयकर त्रास व्हायचा. आशेच एका दिवशी ते जायला निघाले.

आम्हच्याकडे येण्यार्या पाहुण्याना जाताना बस स्थानकावर (मराठीत stand वर)पोहचवण्याची पध्दत होती आणि आहे. त्यामुळे पाहुणे मंडळीबरोबर घरच्या मंडळीचा पण टांगा ( इतिहास जमा झालेल वाहन) जायचा.

एका टांग्यात माझी आजी, आत्या, भाऊ वगरै जात होते. काय झाल माहित नाही बहुदा दगडावरुन टांगा गेला असणार आणि टांगा पलटला.

सर्वानाच थोडफार लागल. पण आजीला जरा जास्तच लागल. एक दोन टाके पण पडले. आशा अवस्थेत जाण आत्याला बरं वाटना. म्हणुन आत्यानी ठरल दोन चार दिवसानी जाऊ. आणि आम्ही परत फिरलो.

आजीला लागल होत डॉक्टर तपासत होते आणि आम्ही मुल नाचत होत कारण जाण दोन दिवसानी लांबल.

त्याकाळात आजीला लागल असताना असा आंनद व्यक्त करण बंर नाही हे कळतच नव्हत.

आज?????????????????????

Monday, March 8, 2010

रंगपंचमी

परवा रंगपंचमी झाली. सोसायटीतील लोकांनी साजरी पण केली. ४००,५०० रुपयाचा रंग हि असेल. पण ती मज्जा नाही आली जी पुर्वी येत असे. ४,५ रुपायाचा रंग असे पण मज्जा ४,५ लाखाची असायची?

माझी आजी नेहमी म्हणायची "माझी मुल हिच माझी दैवत" आणि खंरच आजीनं मुलाची (माझ्या वडीलाची, आत्याची) खुप काळजी घेतली आणि केली पण. तसच त्याच्यावर चांगले संस्कार होतील याच्यावर पण लक्ष्य ठेवले.

रंगपंचमी वरून आठवल. माझ्या वडीलाच्या लहानपणी आजी रंगपंचमीसाठी गरम पाणी करुन द्यायची. आज रंग खेळण्यासाठी "गरम पाणी" वाचुन थोडस हासू पण येईल पण आजीचा दृष्टीकोन फारच सरळ होता. "गार पाण्यामुळे मुलाना काही त्रास होऊ नये.  मुल आजारी पडू नये"

यापुढे जाऊन हि आणखी एक गंमत म्हणजे, हे गरम पाणी माझे वडील किंवा आत्या इतर मुलाच्या आंगावर उडवत आणि ती मुल मात्र यांच्या आंगावर गार पाणी उडवत. आजी म्हणायची माझी मुल काय आणि इतराची काय त्रास कोणालाही होऊ नये.

हेच संस्कार आजही जपायचे प्रयत्न करतो आहे. दुसरा आपल्यावर गारपाणी उडवत असला तरी आपण गरमपाणी उडवायच.

Tuesday, March 2, 2010

बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय

मी त्यावेळी साधारण आठवीत होतो. रसायनशास्त्राच्या सुरवातीच्या धड्यात किमयागार नाईल नदी वैगरे माहिती होती. किमयागाराना परीस, अस द्रव्य ज्या मध्ये सर्व पदार्थ वितळतील अश्या काहिश्या वस्तू तयार करायच्या होत्या म्हणे. त्यावरुन आम्ही ४,५ मित्र फारच प्रेरित (Inspire) झालो. आम्ही आठवीत असल्यामुळे आम्हाला प्रयोगशाळेत जाता येत नसे. परंतू एका दुसर्या शाळेच्या प्रयोगशाळेत आम्ही जाऊ शकत होतो. एक दिवस आम्ही त्या शाळेच्या प्रयोगशाळेत गेलो. ज्या पदार्थाची नावे माहित होती ते पदार्थ आम्ही थोडे थोडे वेगवेगळ्या पिशवीत घेतले ( का चोरले?????). एका मित्राने एक bag (मराठीत काय?????) आणलीच होती त्यामध्ये या सर्व गोष्टी त्यामध्ये ठेवल्या. दुसर्या दिवसा पासुन प्रयोगाला सुरवात पण केली. आमच्या घराच मागचं अंगण हिच आमची प्रयोगशाळा. आम्हाला नक्की वाटत होत की आम्ही दोन चार दिवसात आम्ही नक्कीच कशाचा तरी शोध लावू.


असाच किस्सा कॉलेजचा. संख्याशात्रात Distribution (मराठीत काय??????) असतात. थोडे दिवस संख्याशात्राचा अभ्यास केल्यावर लक्षात आल आपण पण आपल्या नावान एक Distribution काढू शकतो. Kalyan's distribution.

आज जाणवत दोन्ही गोष्टीत मनाचा बालिशपणा होता.

आपला पगार किती टक्क्यानी वाढला? कोणत रेटींग मिळाल? पदोनत्ती(Promotion) झाली का नाही? हे जरी आज यक्षप्रश्न वाटत असले तरी काही दिवसानी हा पण बालिशपणाच वाटेल?

बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय मला वाटत यामध्ये फारच अंधुक रेषा आहे?

Tuesday, February 23, 2010

हडळीचा जन्म

हडळीचा जन्म


(द. मा.ची माफी मागुन)

मे महिना म्हटला म्हणजे आमच्या घरात गोकुळ. माझे आते, मामे, मावस, चुलत मामे भावंड अशी १०,१२ मुल असायचीच. असाच एका मे महिन्यातली गोष्ट.

आमच्या समोरच्या घरात बाधंकाम चालू होत. आमच अंगण मोठ असल्यामुळे बाधंकामासाठी लागणार्या सळया आमच्याच दारात (अंगणात होत्या). त्याकाळी फलटणमध्ये मंगळवारीच लाईट जायची (आज काल रोजच मंगळवार असतो).

संध्याकाळची ७,८ ची वेळ. घरामध्ये आम्ही फक्त भांवडेच (मी, माझी ताई आणि दोन लहान भाऊ) होतो. अचानक लाईट गेली. कोणीतरी मेणबत्ती आणायला आत गेल back-up (????) ची सोय नव्हतीच. कोणीतरी दार बंद केल. ५,१० मिनीट अशीच गेली. घरात तशी शांतता नव्हतीच पण फार गोधंळपण नव्हता. अचानक माझ्या ताईला कसलातरी आवाज आला....

तिन आम्हाला सर्वाना सांगितल. पण आशी चेष्टा तर कायमच चालायची, त्यामुळ फारच कुणीच लक्ष दिल नाही. दोन मिनीटानी परत आवाज आला. यावेळी माझा लहान भाऊ पण म्हणाला हो मला पण आवाज आला. छुम छुम..

आता मात्र घरात निरव शांतता पसरली. २ मिनीट गेली, ३ मिनीट गेली आणि अचानक परत एकदा आवाज. छुम छुम...

आता मात्र आम्हा भांवडाची अवस्था वाईट झाली. काय कराव आणि काय नको. प्रत्येकाच्या मनात भीती होतीच पण कोणी बोलुन दाखवत नव्हत. दोन चार मिनट अशीच गेली. परत एकदा आवाज आला. माझा लहान भाऊ ओरडला 'हडळ'. मग मात्र सर्वजण घाबरलेच.

दार उघडून बघाव की नको?

माझी ताई दारापाशी गेली, सर्वजण आम्ही घाबरलेलो होतोच. दार उघड म्हणाव की नको?

परत आवाज. ताईन दार उघडल आणि बघतीत तर काय?

एक चिचुंद्री लोखंडी सळई वरुन जात होती त्यामुळे आवाज येत होता. मग मात्र आमच्यात हशा पसरला.

त्यागोष्टीतुन एकच शिकलो. प्रत्येकाच्या मनात 'हडळ' असतेच आपण फक्त दार उघडुन बघाच, ती खरी आहे का? दार उघडण्यासाठी मात्र खुप मनाची तयारी असवी लागते. आज सुध्दा अनेक ठिकाणी दार उघडायची भिती वाटते.

Tuesday, February 16, 2010

परवा काही कामनिमित्त निगडीला गेलो. जातानी चिंचवड मार्गे गेलो. या भागाबद्दल काही आठवणी आहेत. त्या परत एकदा ताज्या झाल्या.


तारीख २० जुलै २००८, रविवारचा दिवस. त्याकाळी रविवारी मी बायकोला भेटायला सासुरवाडीला जायचो. (सुज्ञ वाचकासाठीः बायको मला सोडुन गेली नव्हती, जायची खुप शक्याता आहे.). २० जुलै २००८ ला पण रविवार मी सासुरवाडीला गेलो. नेहमी प्रमाणे त्यांनी राहण्याचा आग्रह केला, नेहमी प्रमाणे मी नाही म्हणणार अस त्यांना वाटल असणार. पण मी हो म्हणालो. Sixth sense (????????) म्हणतात तो काय?

रात्रीचे तीन, साडेतीन वाजले असतील. बायकोच्या पोटात दुखायला लागल. थोडावेळ वाट बघितली पण ते हळू हळू वाढू लागल्याने दवाखान्यात नेण्याच ठरवल.चिंचवड मधील कामताचा दवाखाना. पहाटे ४,५ पर्यत आम्ही तिथ पोचलो. नेहमी प्रमाणे Check-up (??????) झाल्यावर त्यांनी Admit(???? करुन घेतल. चढणार्या सुर्याबरोबर बायकोला होणारा त्रास पण वाढत गेला. तोपर्यत माझ्या घरी फोन करुन माझ्या घरच्याना बोलावुन घेतले. संकष्टी असल्याने आम्हा सर्वाचे उपवास होते. बायकोला होणारा त्रास बघुन मी डॉक्टराना काही करता येईल म्हणुन विचारले. डॉक्टर म्हणाले "मी डॉक्टर आहे. तुमच्या बायकोचा पण जन्म माझ्याच दवाखान्यात झाला आहे. मला काय आणि केव्हा करायच ते कळत". काहिहि असो तो त्रास मला बघवत नव्हता. दुपारचे तीन वाजले बायकोला Operation theater (??????) मध्ये नेल. पावणे चार, चार च्या आसपास मला काही पेपर सही करण्यासाठी देण्यात आले. पेपर वाचण्याच्या तर मनस्थितीत मी नव्हतो पण साधारण पणे Operation च्या वेळेस काही झाल तर डॉक्टराची जवाबदारी नाही वगरै,वगरै. मी सही करुन दिले. पण मनात मात्र आताच का पेपरवर सही घेतली. म्हणतातना 'वैरी न चिंती ते मन चिंती'.

चार सव्वाचारच्या आसपास, डॉक्टर बाहेर आले "तुम्हाला मुलगा झाला, बाळ आणि बाळणतिण सुखरुप आहे" बस्स. त्यानंतर म्हणे एकतास मी पुढ रडत होतो. जवळच्याना फोन वर पण सर्वजण तेच सांगत होते "बाळ आणि बाळणतिण सुखरुप आहे फक्त बाळाचे बाबा रडत आहेत"

आमच्या घरात सर्वाची गणपतीवर फार भक्ती, आईच्या तर कडक संकष्टी असते. आणि त्या दिवशी हि संकष्टीच होती. हा दुग्धशर्करा योगच म्हणाला पाहिजे.

खरच ते लहान बाळ पाहिल्यावर माझ्या आई वडीलानी मला कस मोठ केल असेल यांचे आश्चर्यच वाटत राहीले.

Thursday, February 11, 2010

Break के बाद

बरेच दिवसानंतर आज परत काही तरी लिहावस वाटल.


काही मित्रानी सांगितल "तुझ लिखाण अगदी सकाळ मध्ये देण्यासारख आहे"  ऐवढ्याच वाक्यावर तो थांबला असता तर बस झाल असत. "अरे किती शुध्दलेखनाच्या चुका!".

काहिजण म्हणाले "गोष्ट/प्रंसग अजुन निट लिहता आली/आला असती/असता?"

काहिजण म्हणाले "थापा".

म्हणुन म्हटल नकोच लिहायला. पण नंतर वाटल आपण कुणासाठी लिहतो? कुणी वाचाव म्हणुन की आपल्यासाठी? खरच उत्तर द्यायच झाल तर स्वःतासाठी ५०% दुसर्यासाठी ५०%.
आज ठरवल दुसर्या ५०% सोडुन देऊ.

अनेकानी विचारल का रे बाबा थांबवलस लिखाण?

परत एकदा लिखाण सुरु करतो आहे. शुध्दलेखनाच्या चुका टाळुन, आकर्षक पण थापा वाटु नये.(कस शक्य आहे?) अस करण्याचा प्रयत्न करीन.

Wednesday, February 3, 2010

Mother regiment

आर्मीमध्ये ज्या रेजिमेंटला तुम्ही पहिल्यादा join करता तिला mother regiment म्हणतात (बहुदा). पुढे तो माणुस कुठे हि जावो पण mother regiment एकच असते. प्रत्येकाची नाळ त्याच रेजिंमेटशी जुळलेली असते.

कार्यालयात (मराठीत office) येण्यासाठी मी पुर्वी शिवाजी नगर रुटची बस पकडायचो (का घ्यायचो? का बसायचो?) हि बस मला खरोखर mother regiment च वाटती. बसमध्ये आम्ही पत्ते खेळायचो. पत्त्यामध्ये आम्ही अनेक खेळ (म. game) शोधुन काढले. ब्रिजमेंट (ब्रिज + जजमेंट) किंवा अशे अनेक. office जाण सुध्दा आनंददायी होत.

बसच सरासरी वय (म. avarage age) कमी असल्यामुळे म्हणा कि सर्वाच्यात काही एक सारखे पणा होता म्हणून म्हणा, पण आम्हीच्यातली मैत्री घट्ट झाली. सगळ्याचे सगळे विचार पटलेच अस नाही. पण त्यामुळे काही problem हि आला नाही.

बसमधले काही लोक कंपनी सोडून गेले. पण बसशी असणारा संबध संपला नाही. आशा लोकाना भेटायला/पत्ते खेळायला म्हणून एके रविवारी भेटलो. इतके आमचे संबध घट्ट झाले होते (आहेत).

सुरवातीला एका बसमधुन office ला जाणारी माणस एवढची ओळख. पण आज नक्कीच यापेक्षा जास्त.

बसमधे चालणारी चेष्टा मस्करी किंवा कुणाच लग्न ठरली कि त्याला/तिला त्रास होई पर्यत चिडवणे या गोष्टी खुपच comman होत्या. बस मधुन उतरल्यावर कुठल्यातरी हॉटेलात बसणे हे ही तितकच comman होत. पण आजकाल मी हे सगळ miss (miss ला इंग्रजीत काय म्हणतात?) करतो?

काही दिवसापुर्वी मी ती बस बदलली. नविन बस आणि त्या मधील मंडळी तितकीच चांगली आहे.
 पण Mother regiment is Mother regiment.

Sunday, January 31, 2010

चटका लावणारी खंमग संध्याकाळ

चटका लावणारी खंमग संध्याकाळ


रविवारचा दिवस, रात्री कुठ तरी बाहेर जेवायला जायचा बेत ठरला. जवळ असण्यार्या सवाई ची निवड केली. या पुर्वी २,३ वेळा मी तिथ जाऊन आलो होतो. तिथल जेवण मला आवडल होत म्हणून परत जायच ठरवल.

जेवण सुरुवात झाली आम्ही दोन भाज्याची मागणी(order) केली. दहा मिनीटानी वेटर भाज्या पानात वाढुन गेला. भाज्या वाढुन गेल्यावर लक्षात आल आपण ऑर्डर केलेल्या या भाज्याच नाहीत. रोटी आणताना पण उशीर झाला. मग मात्र माझ डोक सरकल. मी मालकाना भेटायला कॉर्टरवर गेलो. झालेली परीस्थिती सांगितली. "पानात वाढलेली भाजी

टाकणे किंवा परत देणे आमच्या संस्कृती/संस्कारात बसत नाही म्हणुन भाजी खाल्ली"
त्याना त्याबद्द्ल खरच वाईट वाटल. मला sorry म्हणुन अस परत होणार नाही याची हमी दिली.
मी परत टेबलावर गेल्यावर वेटर टेबल जवळ येऊन "आईसक्रिम घ्याच" बराच वेळा नाही म्हणल्या नंतर आईसक्रिमची पण मागणी(order) दिली. आईसक्रिम complimentary असणार अस वाटल.

आईसक्रिम झाल्यावर बिल मागवल. तर वेटरनी सांगितल "आमच्या कडुन चुक झाली आज तुमच्या कडून बिल घेणार नाही". अरे बापरे. मी परत एकदा मालकाकडे गेलो."बिल घ्या. तुम्ही बिल घेतल नाही तर मला फार विचित्र वाटत(odd feel)"."ग्राहक जो पर्यत संतुष्ट होत नाही तोपर्यत त्याच्याकडून बिल घेणे आमच्या संस्कृती/संस्कारात बसत नाही" बरेच वेळा सांगुन सुध्दा त्यांनी बिल घेतल नाही. त्यांनी बिल न घेतल्यामुळ आम्ही परत त्याच्याकड जेवायला जायच ठरवल.

खरच असा अनुभव आजकालच्या जगात येणे आवघड आहे. पुर्वी मी सवाई मधून चांगल्या अन्नपदार्थची चव अनुभवली होतीच आज चांगल्या अनुभवाची चव चाखल्ली.

Thursday, January 28, 2010

कवी तुझे

देवा, तुझे किती, सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!

- ग. ह. पाटील

कवी तुझे
(ग.ह.पाटीलाची माफी मागुन, माझ्या सारख्या अनेक नवोदित कवींवरील कविता)
कवी तुझे किती | भंकस हे काव्य |
भंकस हे शब्द |मांडतोसी  ||१||

भंकस हा छंद| कल्पना भंकस |
ना जुळे यमक | हि त्याचे ||२||

भंकस हे काव्य| भंकस पुस्तक|
कोणी ही यास | विकत ना घई ||३||

चिडक्या बापाची| वात्रट ही मुले |
तसे काव्य असे | कवी तुझे || ४||

इतुके भंकस |काव्य तुझे जर |
किती तू भंकस |असशील || ५||

Wednesday, January 27, 2010

चहा पोहे

शिक्षकीपेक्षाची आवड असली तरी फार काळ मी शिक्षक म्हणून काम केले नाही. डि.एड. ला असताना १० दिवसे एक शाळा चालवावी लागते. आम्हाला आशीच एक शाळा मिळाली. मुख्याधापका पासुन ते शिपाया पर्यत सर्व कामे आम्हालाच करावी लागत. अर्थात "जवाबदारी"चे कामा माझ्या कडे आले. १० दिवसाचा हिशोब ठेवणे.


मला ६चा वर्ग शिकवायला आला पण हिशोबाच्या कामामुळे वर्गात जाणे जमत नव्ह्ते. पण एक दिवस वेळ काढुन वर्गावर गेलो. एक कविता शिकवायला सुरवात केली. कविता शिकवायला मला बिलकुल आवडत नव्हते. पण त्यादिवशी ती कविता मी २ तास (शाळेचे ३ तास) शिकवत होतो. शिक्षणशास्त्रात न बसणारी गोष्ट. पण मुलाना माझी पध्दत बहुदा आवडली.

शेवट्याच्या दिवशी एका विद्यार्थ्याने(शंकर) व विद्यार्थीने (कविता) चहा व पोहे खाण्यासाठी बोलाबले. एकटे कसे जायचे म्हणून आणखी एका शिक्षकमित्राला बरोबर घेतले. कविताच घर म्हणजे झोपडीच होती. घराबाहेरील बाजेवर आम्ही बसलो. १०-१५ मिनीटानी पोहे घेऊन कविता आली. पोह्यात पोहे व शेंगदाणे याच प्रमाण अगदी सारख होत. मला वाटल पुर्ण महिन्याचे शेंगदाणे तिने पोह्यात टाकले की काय? पोहे संपवून चहा पिण्यासाठी शंकरकडे जाणार होतो. शंकरच घर याहुन खराब असणार म्हणून घरी नेण्याऐवजी आम्हाला आहे तिथेच बसवणे त्याने पसंत केल. चहा येथेच घेऊन येतो अस म्हणत शंकर घरी निघुन गेला. ५ मिनीटात दोन कपबश्या घेऊन शंकर आला. चहा कपात तर पुर्ण भरला होताच पण बशीपण भरली होती. चहाचा पहिला घोट घेताच यात साखर दुप्पट टाकली आहे हे लक्षात आल. कसातरी तो चहा संपवला. दोघाच्या चेहर्यावरील आनंद लपता लपत नव्हता.

परत येताना माझा मित्र मला म्हणाला "तुला माझ्या पेक्षा कमी गोड चहा लागतो, शंकरचा चहा तर मला गोड लागत होता." त्याला म्हटला "बाबारे, पोह्यात जेवढे शेंगदाणे तेवढे पोहे चांगलेः चहात जेवढी साखर तेवढा चहा चांगला आशी समजुत असते. त्यांनी टाकलेली साखर व शेंगदाणे हे त्याचे महिन्याचे असतील. चहा पोह्याबरोबर त्यांनी दिलेल प्रेम जास्त महत्वाच आहे."

खरच आशे चहा पोहे मी आयुष्यात परत कधीच खाल्ले नाहीत.

Tuesday, January 26, 2010

आम्ही नाही तर तुम्ही पण नाही

मी ८-१० वर्षाचा असेन, मावशीच्या नविन घेतलेल्या निगडीच्या घरात ४,५ दिवस राहयला गेलो होतो. संध्याकाळी बिल्डीग मधील मुलांबरोबर खेळायचो. एक दिवस आम्हाला (मला आणि माझ्या लहान भावाला) खेळायला जायला उशीर झाला. खेळ आधीपासुन सुरु होते. आम्हाला पण खेळायला घेतील म्हणून आम्ही गेलो. उशीरा येण्यार्याना खेळात घेत नाही अस एका मुलीन आम्हाला सुनावल. "आम्हाला खेळायला घेत नाही म्हणजे काय?" असा विचार आम्हच्या दोघाच्या मनात आला. आम्ही परत येत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना (idea) आली. मी फलटणहुन "म्हातारीच्या शेंगा" आणल्या होत्या. त्या शेंगामध्ये ५०,६० "म्हातार्या" असतात. मी घरात जाऊन एक शेंग आणली. मी आणि माझा भाऊ ती मुल खेळत होती त्याच्या आसपास "म्हातार्या" उडवू लागलो. अपेक्षित परीणाम ५ मिनीटातच झाला. सर्व मुल खेळ सोडून "म्हातार्या" पकडायला लागले.

"आम्हाला खेळायला घेतले नाही ना मग तुमचा पण खेळ होऊ देणार नाही" Typical Marathi mentality (मराठी शब्द?????).

आज मात्र जाणवत आपण तस करायला नको होत.

Monday, January 25, 2010

माझे सांस्कृतीक जिवन 2

धुपद आठवडाः


ह्या आठवड्यात दोन वेगवेगळे कार्यक्रम होते. राजाभाऊ देव (गान रम्मया) स्मृती समारोह आणि धरोहर

राजाभाऊ देव (गान रम्मया) स्मृती समारोह

कार्यक्रमाची सुरवात शिवानी मारुलकर( अलका देव-मारुलकर यांची कन्या व राजाभाऊ देव यांची नात)यांनी नंद-कल्याण या जोड रागाने केली. हा राग या पुर्वी मी कधीच ऐकला नव्हता. त्यानंतर त्यानी कलिगडातील टुमरी गायली. त्या नंतर गुदेच्या बधूनी शंकरा राग सादर केला. आडाण्यातील शिवा शिवा या बंदिशेने शेवट करणार होते. पण लोकागरास्तव त्यांनी आणखि एक रचना सादर केली. पण ती रचना 'शिवा शिवा' पुढे थोडी dull वाटली

धरोहर

मालकंस संस्थेने आयोजित या कार्यक्रमात उदय भवाळकर यांनी धुपद सादर केले त्यांना सुखविदंरसिंग नामदारी यांनी साथ केली. सुखविदंरसिंग नामदारी यांनी धामा वाजवला. धामा हा पखवाजच्या अगदी जवळचे वाद्य. धामा या पुर्वी मी कधीच ऐकला नव्हता.

एकुणच कार्यक्र्म energetic होता.

उदयजीनी यमन (आलाफ, जोड, झाला) रागाने सुरवात केली. त्यानंतर त्यांनी आडाण्यातील शिवा शिवा या बंदिश गायली. मध्यतंरानंतर त्यांनी जोग (आलाफ, जोड, झाला) राग सादर केला. कार्यक्रमाचा शेवट "ब्रिज में होली" (बहुतेक कॉफी)रचनेने केला.

सुखविदंरसिंग नामदारी यांनी केलेली साथ अप्रतिम होती. "और कर्जा चढ गया" अस म्हटल तर वावग होणार नाही. कारण कार्यक्रमाच तिकीट आणि मिळालेला आनंद यात फारच तफावत होती.

कार्यक्रम energetic असल्यामुळे शेवटी शेवटी उदयजीच्या आवाजात थकवा जाणवत होता.

एकंदर कार्यक्रम अप्रतिम होता.

Friday, January 22, 2010

आमच्या काळात

गोष्ट बारा-पंधरा वर्षापुर्वीची, त्याकाळी प्रत्येकाकड फोन (भ्रमणध्वनी (मराठीत mobile)) सोडाच, पण प्रत्येकाच्या घरी फोन असणे म्हणजे श्रीमंतीच लक्षण मानल जायच. तुमचा फोन आलाय अस शेजारी सांगत यायचा(यायचे). फोन आलाय याचा अर्थ कोणीतरी अत्यवस्थ (मराठीत Serious) अस समजल जायच. त्यामुळे असे फोन घ्यायला फक्त मोठी माणसच जायची. आम्हा लहान मुलाना कधी फोनवर बोलायला मिळायचच नाही. मग मी आणि माझ्या ताईने एक दिवस एक शक्कल लढ़वलीः


त्याकाळी STD ISD बुथ पण फार नव्हते. फलटण मधे २,४ बुथ असतील

एका बुथमधे मी सकाळीच गेलो, माझा १० वाजता फोन येणार आहे. फोन घेण्याचे म्हणून ३.५० रु देईन. बुथवाल्याचा फायदाच होता. १० वाजता माझी ताई, दुसर्या बुथवर गेली, आणि या बुथचा नंबर लावला. मी फोन घेऊन बोलायला पण सुरवात केली. सवयी प्रमाणे ४०,४५ सेकंदात बोलण संपल. दोघानी ३.५० रु दिले. त्यावेळी फोनवर बोललेलो ४०,४५ सेकंदाची जी मज्जा होती ती आज कशातच नाही. उलट फोनवर बोलता येण कस टाळू शकतो हेच आजकाल मी पाहत असतो.

दलाईलामा "Paradox of Our Age" मधे म्हणतात तसं काहिस झाल आहे.

……

We built more computers to hold more information to produce more copies than ever, but have less communication……

From aamhimarathi


http://www.aamhimarathi.in/wp-content/uploads/blogger/x/blogger/8117/2809/1600/169914/image0151.jpg

Wednesday, January 20, 2010

thank you

वेळ रात्री एकची,स्थळ मुबई विमानतळच्या बाहेर. साडेबाराच विमान साडेबारालच आल. चेक आऊट पण लवकर झाल. दिड वाजता विमानतळच्या बाहेर. पिकउप करणार्या गाडीचा चालक (मराठीत Driver) शोधत आणि हातात मोठी bag घेऊन मी तिन/ चार फेर्या पण झाल्या पण तो काहि सापडला नाही. Driver ला साडेबारालाच येयला सांगितल होत. हा अजुन का आला नाही? माझ्या जवळ Driver चा फोन नव्हता. फोन होता पण computer वर. आता laptop काढुन त्यातुन नंबर शोधा, माझ्याकडील मोबाईल चार्ज नाही म्हणजे टेलीफोन बुथ शोधा. फारच चिडचिड झाली. तेवढ्यात हातात बोर्ड घेतलेला दुसरा Driver "पुण्याला येणार का?" " नाही" "चला कमी दरात नेतो" "नको". दुसर्या Driver ने माझी मानसिकता चांगलीच ओळखली होती. मी बाजुला जाऊन lapto काढला फोन नंबर शोधत असताना "साहेब येणर का पुण्याला?" परत तोच Driver "नाही रे बाबा". शेवटी एकदाचा फोन नंबर मिळाला. चला फोन करून बोलाबुन घेऊ. खिशात हात घातला 'अरे पाकीट कुठे गेले?' ' ओ नो, पाकिट मारल गेल' जवळपास बघितल तर तोच Driver माझ्याकड बघत होता. "काय झाल?" "बहुतेक माझ पाकिट मारल. मला फोन करुन Driver ला बोलवायच होत" मी म्हणालो "सांगा नंबर" Driver. मी नंबर सांगितला, त्याने फोन केला. तो फोन दुसर्या Driver कडे होता. त्याने नविन नंबर दिला. या Driver ने त्या नंबर वर परत फोन करुन "कुठे आहेस?" आम्ही कुठे उभे आहोत ते सांगितल. "तुमचा Driver पाच मिनीटात येतो आहे." "thank you". पण मनात मात्र येत होत. यानेच माझ पाकिट मारल असणार. पाच मिनिटात माझा Driver आला. फोन केल्याबद्द्ल द्यायला सुध्दा माझ्याकडे पैशे नव्हते. मी माझ्या Driver ला सांगुन ५० रुपये देऊ केले. पण त्या Driver ने घेतले नाही. मी गाडीत बसुन पुण्यात येत असताना. डोक्यात हाच विचारः त्या Driver ने पाकिट मारले. मग मदत केल्याच नाटक केल. मला पाकिट गेलाच दुःख जास्त नव्हत, पण फसवला गेलो याच मात्र जास्त होत.


दोन चार दिवस हाच विचार माझ्या मनात येत होता. आपण त्या Driver ला काहिच का म्हटलो नाही? लहानपणापासुनचे संस्कार का पुरावा नसताना अस बोलण बरोबर नाही. आणि अचानके एअर लाईन चा फोन "तुमच पाकिट विमानात पडल होत. आतील कागद पत्रावरुन हे पाकिट तुमच आहे. लवकरच ते तुमच्या पत्त्यावर पाठविल जाईल.

' ओ. माझ्य पाकिट माझ्या चुकीमुळे पडल होत आणि मी मात्र संशय्य एका चांगल्या माणसावर घेत होतो. मी त्यावेळी त्या Driver ला काहि बोललो असतो तर मी मलाच आयुषभर माफ करु शकलो नसतो.

संस्कारामुळे मी परत एकदा वाचलो. त्याला म्हणलेले thank you हे पण मनापासुन नव्हते. आज thank you म्हणायच तर कस? कुणाला?

बाजारातील पत

माझ्या लहानपणी घरी सायकल असणे म्हणजे श्रीमंतीच लक्षण. एखाद्याकड रेंजर सायकल म्हणजे श्रींमंतीचा कळस. माझ्याकड सायकल होती पण मोठी २२ इंची. माझी उंची पण २२ इंचीच होती, म्हणून छोटी सायकल भाङयाने आणून खेळणे हा सुट्टीतल एक उघोग. तासाला २० पैसे वगरै भाड.


एका सुट्टीत असच सायकल भाङयाने आणून खेळत होतो. एक तास पुर्ण वापरायच आणि मग सायकल द्यायची हा आमचा नेहमीचा उघोग. सायकल परत द्यायला गेल्यावर त्यांनी २५ पैसे मागितले माझ्याकड तर २० च पैसे. काय करु? "५ पैसे आणून देतो" "बर". मी १०-१५ मिनीटानी ५पैसे द्यायला परत त्याच दुकानात गेलो. दुकानदाराने एक क्षणभर माझ्याकडे बघितले. "कुणाचा रे तू?" मी माझ पुर्ण नाव व पत्ता सांगितला. "तु पैशे आणून नसते दिले तरच विशेष होत" त्या वाक्याचा माझ्या बालमनावर जो परीणाम झाला, कि आज पर्यत कुणाचे पैशे बुडवण्याचा विचार सुध्दा मनात आला नाही.

आपण आपली किमंत बाजारात मिळू शकोतो की नाही हा महत्वाचा प्रश्न आहेच पण असलेली किमंत टिकुन तरी टेवली पाहिजे.

Monday, January 18, 2010

आग्रहाच म्हणून घेतो

माझे लहानपण माझ्या घरी कमी आणि समोरच्या वाड्यात जास्त गेल. घरासमोर भिडे वाडा म्हणुन वाडा. ७-८ कुटुंब या वाड्यात भाङ्याने राहत होती. सर्वात लहान असल्यामुळे सर्वांचा लाडका. वाड्यात राहण्या-या कुणाच्याही घरी जाणे, त्यांनी दिलेल्या वस्तू खाणे हा माझा रोजचाच कार्यक्रम होता. पण एक दिवस माझ्या आजीने मला विचारले "काय रे, आज पोहे खाऊन आलास का?" आणि मी घाबरलो आजीला कस कळलं मी पोहेच खाऊन आलो होतो? आजीला खुप वेळा विचारल्यावर आजीने सांगितले "मला नळातून ऐकू आले"

दुस-या दिवशी वाड्यात येतानाच नळ बंद करुन आलो. पण तरी पण आजीला कळायचे ते कळलच. आजीन मला जवळ घेऊन सांगितले "अस रोज दुस-याकडे खाणे बर नाही. आपण नाही म्हणावं. खुप आग्रह केला तरच घ्यावे" दुस-या दिवशी नेहमी प्रमाणे मला समोरच्या वाड्यातील इनामदारमामीनी खायला दिल. "कल्याण आज उप्पीट केल आहे. घे बर का" इनामदारमामी "नको" मी, "कारे काय झाल?" "आजी म्हणाली खुप आग्रह केला तरच घे नाहीतर नको म्हण" अपेक्षित वाक्याचा योग्य परिणाम झाला. मामी  "आग्रह म्हणून घे". मी म्हणालो "नक्की. आग्रह केला म्हणून घेतो."

हा प्रश्न मला अनेक वर्ष पडला होता की माझ्या आजीला मी कोणता पदार्थ खाल्ला हे कसं कळायचं? खुप वर्ष माझी आशी समजुत होती की नळातून आवाज जातो. त्याकाळी फक्त सकाळी व संध्याकाळी नळाला पाणी यायचं. आणि वाड्यात जाताना, मी कायम नळ बंद ठेवायचो. पुढे अनेक वर्षांनी कळाले की तो नळ म्हणजे आमच्या व समोरच्या वाड्यात काम करणा-या चंद्राबाई.

पुढ़े बरेच वर्ष मला आग्रहच म्हणुन खायला घातले. त्याकाळी पोहे, उप्पीट हेच विशेष होत. आज अनेक पदार्थ मिळतात पण ते आग्रहाचे नसतात.

निरा उजवा कालवाच पाणी

निरा उजवा कालवाच पाणी
मोठे लोकानी कर्हेचे पाणी, कृष्णाकाठ अशी पुस्तके लिहिली जर मला आत्मचरित्र लिहावस वाटलच तर मी काय नाव देईनी "निरा उजवा कालवाच पाणी".

कारण माझ गाव फलटण. या गावाशेजारुन हाच कालवा जातो. माझ लहानपण खरच सुखात गेल ( आत्ता दुःखात आहे का?).

Sunday, January 17, 2010

माझे सांस्कृतीक जिवन

परवाच Spicmacay Heritage 2010 ची रात्रभर चालण्यार्या मैफिलीला गेलो होतो. खरतर रात्रभर चालण्यारी एक पण मैफिल ऐकण्याचा योग आला नव्हता म्हणुन जरा जास्तच उत्सुकता.


कार्यक्रमाची सुरवात बिरजू महाराज आणि शाश्वती सेन यांनी केली. महाराजानी ताल सर्वत्र कसा आहे यांची सुंदर उदाहरणे दिली. फोनची वाजणारी घंटा, मित्रामधील संभाषण, आणि आशी कितीतरी उदाहरणे दिली. "ताल नसतो तिथे प्रलय असतो" हे वाक्यतर कायमच मनात घर करुन गेल. महाराजानी केलेल मयुर नृत्य व शाश्वतीनी केलेला आहिल्या अभिनय तर वाखाण्यासारखच होता.
यानंतर उदय भावाळकर(Uday Bhawalkar मराठी माणसाच नाव मराठीत लिहताना त्रासच होतो.) चंद्रक़ंस सादर केला. धुपद गायनातील अनेक बारकावे त्यांनी उलघडुन सांगितले. त्यानंतर त्यांनी शंकरा रागात आणखी एक रचना सादर केली. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी सुरताल रचनेने केला.
माणिक मुंडेनी केलेली पखवाजाची साथ खंरच छान होती. कधीकधी धुपदमध्ये स्वंत्र पखवाज वादनाची काही पखवाजवादकाना सवय असते. thank god मणिकजी तसे नाहित.


रात्रीचा जवळपास १ वाजत आला होता. नयन घोष यांनी वाचस्पती या रागाने सुरवात केली. खरतर गाईये गणपती अनेक वेळा ऐकल्याने त्या गाण्यासारख ऐकायला मिळेल अस वाटल.पण तंस काही झाल नाही. त्यामुळे राग थोडा बोर वाटला. पण नंतर वाजवलेली धुन खरच खुप छान होती. त्यांना तबल्याची साथ मुकेश जाधव यांनी केली.

जवळपास ३ च्यासुमारास आश्विनीताई भिडे-देशपांडे यांनी गाण्याची सुरवात केली. त्यांनी राग मालकंस यांनी सुरवात केली. मालकंसमधली पहिली बंदिश मला थोडी बोर वाटली. पण ताई म्हणल्या तसं रात्री तीन वाजता गायला बसणे हेच खरतर आवघड आहे. त्यानंतर त्यांनी हिदोल हा राग गायला. रात्रभर चालण्यार्या मैफिलीची देणगी अस म्ह्टल तर फारस वावंग होणर नाही, कारण हा राग live ऐकणे आता दुर्मिळ होत चालल आहे. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी भजनानी केला. सुयोग कुडलकर आणि रामदा पळसुले यांनी त्यांना साथ केली


सरवर हुसैन

खरतर सांरगी वादक दुर्मिळ होत चालले आहेत. सरवर हुसैन हे अशेच एक सारंगी वादक. "चांगल्या गोष्टी माझ्या गुरुच्या आणि वाईट गोष्टी माझ्या" हे त्याच्या वाक्यानी वादनाला सुरवात केली. त्यांनीही बंसत मुखारी हा live कमी ऐकायला मिळणारा राग वाजवला. त्यानंतर त्यांनी खमाज मधील वैषव जन हे प्रसिध्द भजन वाजवल.

एकदंर सर्वच मैफिली सुंदर झाल्या. कार्यक्रमाचे नियोजन पण फारच सुरेख होते. तरुणवर्गाचा मिळणारा प्रतिसाद (मी म्हातारा झालो कि काय?) बघता शास्त्रीय संगिताला मरण नाही. Spicmacay च्या सर्वच कार्यकर्ताचे मनापासुन आभार

For more details of concerts:

http://spicmacay.com/events/tentative-schedule-heritage-2010

माझे सांस्कृतीक जिवन

नमस्कार


मी कल्याण. बरेच दिवस पासून दररोज काहीतरी लिहाव अस वाटत होत आज योग आला दररोज काही लिहता येईलच याची खात्री नाही पण प्रयत्न जरुर करणार आहे.

पुण्यात राहात असल्यामुळे संस्कृती/गायन/चित्रपट यावर अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार अगधी जन्मापासुन आहेच. त्याच अधिकाराचा वापर मी या blog वर करणार आहे.

वाचकानी(मिळालेतर) हि लेखकाची वैयक्तिक मते म्हणुन सोडुन देण्यायेवजी आपले मत मांडावे.
शुध्द्लेखणाच्या चुका वाचकाणी मणावर घेऊ णयेत.