चटका लावणारी खंमग संध्याकाळ
रविवारचा दिवस, रात्री कुठ तरी बाहेर जेवायला जायचा बेत ठरला. जवळ असण्यार्या सवाई ची निवड केली. या पुर्वी २,३ वेळा मी तिथ जाऊन आलो होतो. तिथल जेवण मला आवडल होत म्हणून परत जायच ठरवल.
जेवण सुरुवात झाली आम्ही दोन भाज्याची मागणी(order) केली. दहा मिनीटानी वेटर भाज्या पानात वाढुन गेला. भाज्या वाढुन गेल्यावर लक्षात आल आपण ऑर्डर केलेल्या या भाज्याच नाहीत. रोटी आणताना पण उशीर झाला. मग मात्र माझ डोक सरकल. मी मालकाना भेटायला कॉर्टरवर गेलो. झालेली परीस्थिती सांगितली. "पानात वाढलेली भाजी
टाकणे किंवा परत देणे आमच्या संस्कृती/संस्कारात बसत नाही म्हणुन भाजी खाल्ली"
त्याना त्याबद्द्ल खरच वाईट वाटल. मला sorry म्हणुन अस परत होणार नाही याची हमी दिली.
मी परत टेबलावर गेल्यावर वेटर टेबल जवळ येऊन "आईसक्रिम घ्याच" बराच वेळा नाही म्हणल्या नंतर आईसक्रिमची पण मागणी(order) दिली. आईसक्रिम complimentary असणार अस वाटल.
आईसक्रिम झाल्यावर बिल मागवल. तर वेटरनी सांगितल "आमच्या कडुन चुक झाली आज तुमच्या कडून बिल घेणार नाही". अरे बापरे. मी परत एकदा मालकाकडे गेलो."बिल घ्या. तुम्ही बिल घेतल नाही तर मला फार विचित्र वाटत(odd feel)"."ग्राहक जो पर्यत संतुष्ट होत नाही तोपर्यत त्याच्याकडून बिल घेणे आमच्या संस्कृती/संस्कारात बसत नाही" बरेच वेळा सांगुन सुध्दा त्यांनी बिल घेतल नाही. त्यांनी बिल न घेतल्यामुळ आम्ही परत त्याच्याकड जेवायला जायच ठरवल.
खरच असा अनुभव आजकालच्या जगात येणे आवघड आहे. पुर्वी मी सवाई मधून चांगल्या अन्नपदार्थची चव अनुभवली होतीच आज चांगल्या अनुभवाची चव चाखल्ली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Tumcha blog wachun atishay anand jhala, ase experience far kami lokach share karatat, kadar karnare loka ahet hyacha anand watato...thanks for sharing your valuable experience....
ReplyDeleteKharacha asa anubhav yene khup rare aahe.Sawai sarakhicha bakichyani ashi Sanskriti jatan karavai ashi apan fakt aasha karu shakato.
ReplyDelete