Thursday, December 8, 2011


कित्येक वायदे तू मोडलेस होते
वा-यावरी मला तू सोडलेच होते

येणार मार्गी या होती अशी आशा
आधीच येथले काटे वेचलेच होते

धरीला होता 'नाही' मनी आम्ही
ते पण शब्द फार बोचरेच होते

आता जागा ह्रद्यावरी राहीली
कित्येक घाव अजुनही ओलेच होते

आली कशी धुंदी पेल्यास, हे कळेना
अगणित मद्य यांने रिचवलेच होते

ना कल्पना नवी ना शब्दराजदा’
असंख्य शेर आशे मी रचलेच होते

Tuesday, November 15, 2011

गज़ल

After many days…….
उनके आने की थी बहोत आस
काफ़िर निकाला वह ना-शिनास
मानेंगे हम भी तो खुदाको
समझले अगर वह मेरा इखलास
ना समझा ना समझेगा कोई मुझे
इतना दुशवार है समझना एहसास!
गज़ल लिखेगा हररोज 'राजंदा'
होना तो चाहिए रोज कुछ खास


ना-शिनास: Ignorant इखलास: sincerity/purity/love/selfless worship

Friday, July 15, 2011

गुरू

ज्योतीनं दुस-या ज्योतीला पेटलवल्यावर पहिल्या ज्योतीच काहीचं कमी होत नाही. ह्या उक्तीच स्मरण ठेऊन आयुष्यभर देतच राहणा-या सर्व गुरूना सादर प्रणाम.

Wednesday, June 22, 2011

फक्त सलामच


मागच्या आठ्यवड्यात सहजच विकीची पानं चाळत होतो. अचानक 'राजीव दीक्षित' या पानावर थांबलो.
खरं तर ८,९ वर्षापूर्वी पासुन मी या नावाशी परिचित. 'आझादी बचाव' असो किंवा स्वदेशी वस्तूचा आगह असो.
या ना त्या कारणाने त्यांच्या बद्दल ऐकलं होतं. एका ओळखीच्या व्यक्तीन मला त्यांचा आझादी बचाव हा ध्वनीमुद्रीकांचा संच(मराठीत cassette set) दिला. बस्स. अप्रतिम हा एकच शब्द दुसरा शब्दचं नाही.
कळत नकळत त्या माणसाचा मी भक्तच झालो. दिवस, वर्ष जात गेली. मी माझ्या कामात व्यग्र(व्यस्त नाही) होत गेलो.

परवा विकीच्या पानावर त्यांच्या नावची लिंक मिळाली. मला धक्काच बसला. 'राजीव दीक्षित' जन्म ३०-११-१९६७ आणि मृत्यू ३०-११-२०१०.

मला माहितच नव्हत की राजीवजीचा मृत्यू झाला आहे. मला १०,१५ मिनट काही सुचेना. मला आशी बातमी वाचलेली पण आठवेना. त्यानंतर मी माझ्या परीचयाच्या वेगवेगळ्या वयातील ३५ लोकांना विचारल "तुम्हाला 'राजीव दीक्षित' नावाची व्यक्ती माहित आहे का?"  २६ लोकं हो म्हणाले. त्या २६ लोकांना विचारलं "ते गेले हे तुम्हाला माहित आहे का?"  फक्त ३ जण "हो" म्हणाले. त्यांना ओळखण्या-यापैकी १२% लोकांनाच त्यांच्या मृत्यूबद्दल माहित होतं. हे काय??????

वर्तमानप्रत्र शांत का बसली? त्याचे अनेक सहकारी शांत का बसले? यावेळी कुणीच आदोलंन का केलं नाही? या प्रश्नाची उत्तर माझ्याकडं नाहित.
मला माहित असतं: सलमानचा नविन चित्रपट कोणता येणार आहे? एका जहिरातीसाठी धोनी किती पैशे घेतो? शाहरुखच्या बंगल्याचे नाव काय आहे? किंवा यासारख्या अनेक गोष्टी ज्यांचा मला काही उपगोग नाही. पण माहित आहेत.
काल सकाळमध्ये 'माकड आणि माकडीच्या लग्नाबद्दल बातमी होती' अश्या अनेक वृत्तपत्राना या बातमी पेक्षा 'राजीव दीक्षित' यांच्या मृत्य़ुची बातमी कमी महत्वाची वाटली!
दोष सगळ्याचाच आहे.
राजीव दीक्षित किंवा जे.डी. आशी अनेक उदाहरण आहेत. त्या सर्वाना सलाम या कवितेतून.

फक्त सलामच


ऐकून वाईट वाटलं आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत
पण या शिवाय मी अजुन काय करु शकतो
हा, जर असतास फेसबुकवर तर तुझ्या स्टेंटसला केल असतं लाईक
लाठ्या खातानाच्या फोटोवर टाकली असती कॉमेंट
“केवढ हे कौर्य!”
पण बस्स या पेक्षा जास्तची अपेक्षा करू नकोस
माझ जीवन अडकलं आहे त्याच त्याच गोष्टीत
तोच बॉस, तेच appraisal तेच तेच आणि तेच तेच
पण जेव्हा भरतो हप्ता तेव्हा कळतं काम करण्याच कारण
पण तुझ तसं नाही, हे विश्वची माझे घर
कधी वाटतं झोकुन द्याव तुझ्याबरोबर
पण पण
तुझं appraisal करती सामान्य जनता
थोडी जरी चुक झाली तरी बरसतात शिव्या
आता मला सवय झालीय
खोट्या नाटकी वागण्याची
तुझ्या सारखं खरं वागण जमणार नाही रे मला
ते तुला अनेक गोष्टी द्यायला तयार आहेत 
देतील तुला थोडे पैसे शांत बसण्याचे
पण मला माहीत आहे तू ते घेणार नाहीस
मग देतील तुला विष
स्वस्त आहेरे ते, शोधाव लागतील
तुझ्या सहका-याचे हात जे कालवतील तुझ्या जेवणात
पण काळजी करू नकोस सोपं फार ते
पैसे टाकल्यावर माणसं डोक्यांनी जास्त आणि मनानं कमी विचार करतात
किंवा शोधावी लागेल एखादी गोळी
जी जाईल तुझ्या शरीराच्या आरपार
थोडे पैसे दिल्यावर सापडेल बंदूक चालवणारा
निवड तुला करायची आहे
गोळी का पोळी, पुरणाची पोळी
पण मला माहीत आहे तू निवडलीस भाकर
तुझ काहीही होऊ शकणार नाही
मी फक्त करू शकतो सलाम
सलाम तुला
सलाम तुझ्या लढ्याला
आणि सलाम तुझ्या मरणाला

Sunday, June 12, 2011

गज़ल


तुम्हे ढुंडा इस तरह गल्ली गल्लीयो में
भुल गये है खुद का मकान कोनसे गल्लीयो में

खुदा और तुम बुलकुल ही हो एक जैसे
दोनो घर बना लेते हो रकीब के गल्लीयो में

कामयाबी में लगते चार चॉद  होती दुकान
अगर दिल रफ्फू करनेकी तुम्हारी गल्लीयो में

मौतसे ना डरता हू लेकीन हा मगर
एक ख्वाईश ना आये वह तुम्हारी गल्लीयो में

ढुंडता रहा मै जिसको इधर उधर
मिली 'राजदा' को गज़ल इसी गल्लीयो में

Tuesday, May 17, 2011

लहानपण देगा देवा


बरेच दिवसात फलटणला जाण्याचा योग आला नव्हता. तो शनिवारी आला. दुपारच जेवण झाल्यावर थोड झोपावं म्हटलं. ऑफीसमध्ये (office) सुध्दा दुपारी झोपतो, पण officially नाही.
पुतणीला झोप येत नसल्यामूळे तिचे काहीतरी खेळ चालले होते. त्यामुळे होणारे आवाज... थोडासा मी वैतागलोच.  पण नंतर मात्र लहानपणात गेलो.

मला चांगलच आठवत उन्हाळ्यात आमच्याकडं बरेच पाहुणे यायचे. आते,मामे, मावस भाऊ, बहिण. जळवपास ७,८ मुलं तरी असायची. त्यावेळेस काय धम्माल करायचो. दुपारी
घरातले झोपले असले तरी आमचा कालवा चालू असायचा. उन्हाळ्याच्या काळात घरासमोरील आगंण व रस्ता असा मिळून किक्रेटचा डाव चालायचा. पायात चप्पल आहे का नाही याचं सुध्दा भान नसायच. पण त्याकाळात कधी पाय भाजले ही नाहीत किंवा इतर काही त्रास पण झाला नाही. दोन दिवसापुर्वी ऑफीसमध्ये आगीपासुन वाचवण्यासाठी पुनरूक्तीद्वारा दिलेल्या शिक्षणाच्यावेळेस (fire drill) असण्या-या उन्हामुळे संध्याकाळी मला किती त्रास झाला. (हे वाक्य लिहुन आणि वाचकांना वाचुन सुध्दा त्रास झाला.) बहुदा लहानपणीचा सुर्यपण जास्त तापत नसेल.

आमच्या घरासमोरील वाड्यातपण खुप पाहुणे यायचे. कधीकधी पत्त्याचा डाव पण रंगत असे. दुपारच जेवण झाल की हात धुतला की लगेच वाड्यात जायचो. पत्ते, कॅरम, व्यापार किती खेळ
खेळायचो.
किक्रेट खेळतानाचा कायमचा प्रश्न म्हणजे बॉल(चेंडू). त्याकाळी ३.५० रुपायला एक लाल रबरी बॉल मिळायचा. टेनिसचा बॉल म्हणजे श्रीमंतीचं लक्षण. लाल बॉल थोड्या दिवसातच फुटायचा. तो चिटवण्यासाठी किती प्रयत्न केले देवालाच माहित. कधी कधी सायकलच्या टुबचा बॉल तर कधी झाडाच्या शेंगाचा (lawn tree) बॉल. पण त्यात सुध्दा एक गंमत होती. ज्याचा बॉल त्याला दोन वेळा आऊट काराव लागायच.
रात्री अंगणात चटई टाकून घालवलेल्या कित्येक संध्याकाळ. चटईवर झोपल की पाठीला दगड टोचायचे पण ते शोधुन काटुन टाकयचो. सापडलेला दगड काढुन टाकल्यावर कित्ती बंर वाटायच. आज दारात फरशी आहे त्यामुळे दगड टोचत नाहीत, पण असं झोपायला आज कोणाला वेळ आहे?
त्यावेळी वाटायच “मोठं होण्यात मजा आहे”. परीक्षा नाही ना अभ्यास नाही. पण आज कळतं तेच जिवन खरंतर फारच सुरेख होतं. आज रोजचं परीक्षा आहे. सगळाच पेपर अर्निवाय (compulsory) आहे विक्लप(options) नाहितच.
भले आज आसणा-या सुखसुविधा त्यावेळी  नव्हत्या पण सुख होतं. याचा अर्थ असा नक्कीच नाही की आज फार दुख आहे. पण नक्कीच लहानपण हरवल्याचं दुख आहे. म्हणतातचना सगळेच ऋतू चांगले असतात आपण दुस-या ऋतूत असताना.
त्याकाळी २५ पैशे कधीतरी खाऊसाठी मिळायचे त्या पैशात येणारी चिंच. त्यातुन येणारी मज्जा काही औरच होती. त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे खर्च होऊन सुध्दा आनंद!

"कल चौदहवीं की रात थी शब भर रहा चर्चा तेरा" या गझल मध्ये शायर म्हटतो
बेशक उसी का दोश है कहता नहीं ख़ामोश है
तू आप कर ऐसी दवा बीमार हो अच्छा तेरा
उर्दू गजल कायमच दोन पध्दीतीने वाचतात. एक म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी दुसर म्हणजे देव व भक्त. मला मात्र वरचा शेर जीवनाला उद्देशुन म्हटल्यासारखा वाटतो.
बेशक उसी का दोश है कहता नहीं ख़ामोश है
तू आप कर ऐसी दवा बीमार हो अच्छा तेरा

Friday, January 14, 2011

गझल

कल शाम आने का वादा करना बहुत आसा
हसिनाओ के गुनाह माफ करना बहुत आसा
कहते है वह भुल जावो उन्हे कोई समाझाये
भुलना है मुश्किल और याद रखना बहुत आसा
हमने हर एक चीज बेची इस जमीर के लिये
हम वाकिफ़ ना थै जमीर बेचना बहुत आसा
'राजदा' जजबातो को कर दफ्न दिल के कब्र मे
वरना तो इनको गजल में रखना बहुत आसा