Thursday, June 24, 2010

जुनं ते सोनं

मला कायमच वाटत आपण फक्त जुनं ते सोनं असच म्हणत बसतो. माझ्यात पण हा दोष (का? गुण) आहे.


परवा एका वाहिनीवरुन (मराठीत channel) दुसरीकडं जाताना चुकुन दुरदर्शन लागल. कार्यक्रम होता चित्रहार. आणि मी परत माझ्या लहानपण्यातल्या टि.व्ही. कार्यक्रमात गेलो. चित्रहार मोजुन तिन गाणी, रंगोली रविवारी लवकर उठायच नसताना लवकर उठवणारा कार्यक्रम. चित्रगित मराठी गाण्याचा कार्यक्रम.

किती सुरेख होत जग! आज २४ तास गाण्याचे अनेक channels. पण एक तरी channel आपण अर्धातास बघतो का? संध्याकांळी कार्यक्रम सुरु होतानाचा दुरदर्शनचा लोगो. काय मस्त संगीत होत ते!

सुरभी, करमचंद, तहकिकात, गुल गुलशन गुलफाम, बुनियाद, रामायण,जंगलबुक कितीतरी नाव आजही पटकन सांगता येतात. पण सहा महिन्यापुर्वी संपलेल्या मालिकेच नाव आठवायला २ मिनिट लागतात.

मला पुर्वीचे कार्यक्रम तर सोडाच पण जहिराती पण आवडायच्या. "हमारा बजाज", "और मेरे लिये? पानपराग.", "निरमा", "कैलास जिवन" आणि आश्या कितीतरी आणि आज????????

फलटणला रामाचा रथ देवदिवाळीला निघतो. रथ ठेवायची जागा माझ्या घरापासुन जवळ असल्याने आम्हाला त्याचा अभिमान असायचा. गावात लाईटच वायंरीग रस्त्याच्या कडेने असायच. त्यामुळे रथ यायच्या वेळी लाईट बंद केली जायची. चुकुन रथ शनिवारी किंवा रविवारी आला तर मग चित्रपट चालू असताना लाईट जायची. किती मनस्ताप होयचा त्यावेळी. आज एकाच वेळीस अनेक सिनेमे बघतो, पण एकपण पुर्ण नाही.

मी माझ्या मुलाला नक्की सांगु शकेन "माझ्या लहानपणी टि.व्ही.वर काय कार्यक्रम असायचे! पण तो त्याच्या मुलांना काय सांगेल????"

शेवटी वपू म्हणतात तसं "आठवणी कुठल्या का असेनात त्या वाईटच. सुखाच्या असतील तर त्या वेळी असलेले सुख म्हणून दुःख, किंवा दुःखाच्या असतील तर ते भोगलेले दुःख"

Monday, June 14, 2010

मत्सर

आज बरेच दिवसातून परत काही तरी लिहावस वाटल.


मागच्या महिन्यात मी घराच्या मंडळींबरोबर सहलीला (trip)गेलो होतो. पुर्ण सहली बद्दल लिहावस वाटत होत. पण जमलच नाही. म्हणुन काही किस्सेः

मला कायम दक्षिणेकडील राज्याच्या परिवहन मंडळाबाबत (मराठीत S.T.)  हेवा (हेवा कसला मत्सरच) वाटायचा. किती कमी पैशात किती चांगली सेवा! आमच्या प्रवासात आम्ही श्रीशैलम् वरुन विजयवाडाला आंन्ध्रच्या S.T ने प्रवास केला. आम्हाला बसायला जागा होती आणि बस पण रिकामीच होती. हळूहळू बस भरत गेली. आणि अनेकजण उभे पण राहिले. माझ्या शेजारी एक स्त्री, तिची मुलगी आणि मुलगा आशे उभे होते. अचानक मुलगा खिडकी कडे धावला. लहानपणी मला पण गाडी लागायची, त्यामुळे पुढे काय होणार हे माझ्या लगेच लक्षात आल. पण मुलगा काही खिडकी पर्यत जाऊ शकला नाही. त्यांन उलटी करुन गाडी घाण केली.

त्या बाईन स्वःताच्या bag तुन एक त्या मुलाचा एक शर्ट काढला. सर्व घाण स्वच्छ केली. आणि तो शर्ट खिडकीतुन टाकून दिला.

त्यावेळी मी जर महाराष्ट्रात असतो तर काय झाल असत हाच विचार करत होतो.

आपणच केलेली घाण आपणच स्वच्छ करायला पाहिजे?!. हे प्रवासी, चालक वाहक आणि शासनकर्ते या सर्वानाच लगू होत असाव?!.