Friday, January 22, 2010

आमच्या काळात

गोष्ट बारा-पंधरा वर्षापुर्वीची, त्याकाळी प्रत्येकाकड फोन (भ्रमणध्वनी (मराठीत mobile)) सोडाच, पण प्रत्येकाच्या घरी फोन असणे म्हणजे श्रीमंतीच लक्षण मानल जायच. तुमचा फोन आलाय अस शेजारी सांगत यायचा(यायचे). फोन आलाय याचा अर्थ कोणीतरी अत्यवस्थ (मराठीत Serious) अस समजल जायच. त्यामुळे असे फोन घ्यायला फक्त मोठी माणसच जायची. आम्हा लहान मुलाना कधी फोनवर बोलायला मिळायचच नाही. मग मी आणि माझ्या ताईने एक दिवस एक शक्कल लढ़वलीः


त्याकाळी STD ISD बुथ पण फार नव्हते. फलटण मधे २,४ बुथ असतील

एका बुथमधे मी सकाळीच गेलो, माझा १० वाजता फोन येणार आहे. फोन घेण्याचे म्हणून ३.५० रु देईन. बुथवाल्याचा फायदाच होता. १० वाजता माझी ताई, दुसर्या बुथवर गेली, आणि या बुथचा नंबर लावला. मी फोन घेऊन बोलायला पण सुरवात केली. सवयी प्रमाणे ४०,४५ सेकंदात बोलण संपल. दोघानी ३.५० रु दिले. त्यावेळी फोनवर बोललेलो ४०,४५ सेकंदाची जी मज्जा होती ती आज कशातच नाही. उलट फोनवर बोलता येण कस टाळू शकतो हेच आजकाल मी पाहत असतो.

दलाईलामा "Paradox of Our Age" मधे म्हणतात तसं काहिस झाल आहे.

……

We built more computers to hold more information to produce more copies than ever, but have less communication……

From aamhimarathi


http://www.aamhimarathi.in/wp-content/uploads/blogger/x/blogger/8117/2809/1600/169914/image0151.jpg

No comments:

Post a Comment