आणि आम्ही परत फिरलो
मी त्यावेळी खुपच लहान होतो. माझे आते भाऊ आणि बहिण आमच्याकडे राहला आले होते. ते आले कि दिवस मजेत जायचे. पण ते जायचे त्या दिवशी भंयकर त्रास व्हायचा. आशेच एका दिवशी ते जायला निघाले.
आम्हच्याकडे येण्यार्या पाहुण्याना जाताना बस स्थानकावर (मराठीत stand वर)पोहचवण्याची पध्दत होती आणि आहे. त्यामुळे पाहुणे मंडळीबरोबर घरच्या मंडळीचा पण टांगा ( इतिहास जमा झालेल वाहन) जायचा.
एका टांग्यात माझी आजी, आत्या, भाऊ वगरै जात होते. काय झाल माहित नाही बहुदा दगडावरुन टांगा गेला असणार आणि टांगा पलटला.
सर्वानाच थोडफार लागल. पण आजीला जरा जास्तच लागल. एक दोन टाके पण पडले. आशा अवस्थेत जाण आत्याला बरं वाटना. म्हणुन आत्यानी ठरल दोन चार दिवसानी जाऊ. आणि आम्ही परत फिरलो.
आजीला लागल होत डॉक्टर तपासत होते आणि आम्ही मुल नाचत होत कारण जाण दोन दिवसानी लांबल.
त्याकाळात आजीला लागल असताना असा आंनद व्यक्त करण बंर नाही हे कळतच नव्हत.
आज?????????????????????
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment