Sunday, July 8, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ४

संत जनाबाई

जनाबाईंसाठी विठ्ठलाने अनेक कामे केली आहेत. अशा आशयाचे अनेक अभंग आहेत. ('अ' चा अनुप्रास) आणि जनाबाईंनी विठ्ठलाला शिव्या दिलेले पण अभंग आहेत.
त्या शिव्या म्हणजे दोन जुने मित्र भेटल्यावर दिलेल्या शिव्या आहेत. जितक्या शिव्या जास्त तितकी मैत्री घट्ट. जनाबाईंची सख्य भक्ती (म्हणजेच देव हा आपला मित्र असे मानून केलेली भक्ती) आहे.
पण जनाबाईंनी असं काय केलं होतं की विठ्ठल तिचा मित्र झाला? हे जनाबाईंनीच खालील अभंगात सांगितले आहे. लग्न जरी नवरा नवरीचं असले तरी वर्‍हाडी मंडळीना मिष्टान्न मिळत. एकदा लोखंडाला परीसाचा स्पर्श झाला की लोक त्या लोखंडाला गळ्यात घालून फिरतात. तसच माझं (जनाबाईंच) झाल.

नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनी संगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥
जनी म्हणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥

संताचा सहवास वारी शिवाय अजून कोठे मिळणार? चला आज थोडा संताचा सहवास मिळावा म्हणून दिवेघाटपर्यत जाण्याचा (दरवर्षीप्रमाणे) बेत आहे.

No comments:

Post a Comment