Sunday, July 15, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ११


संत रामदासस्वामी
स्वामींनी दासबोधातील एक समास नामस्मरणाचे महत्त्व सांगण्यासाठी खर्ची घातला आहे.
महादेवालासुद्धा नामस्मरणांमुळेच विषाच्या त्रासापासून मुक्ती मिळाली यावरुन नामस्मरणाचे महत्त्व विषद होते. नामामुळेच अनेक पर्वतासारखे दोष नाश पावतात.

नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर । महादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥। २२॥
अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौली ।। २३ ||

No comments:

Post a Comment