Saturday, July 21, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १७

संत बहेणाबाई
बहेणाबाई कुलकर्णी यांचे अभंगात आपल्याच मनाची परिस्थितीचे वर्णन केले आहे की काय असे वाटते. त्यांचे माया व ब्रह्म या विषयीचे अभंग अप्रतिम आहेत.
ज्यांना देवाविषयी विचारायला जातो त्याला अभिमान झाला आहे. ज्यांना माहीत आहे ते सांगत नाहीत. कोणी सांगत ध्यान करा तर कोणी उपासना तर कोणी मंत्र तर कोणी तिर्थाटन.

जेथे पुसो जावे तेथे अभिमान । आपुलेचि ज्ञान प्रतिष्ठी तो ॥१॥
जाणोनि अंतरी न सांगती कोणी । कोणाचे वचनी स्थिर राहो ॥२॥
लय हे लक्षण सांगती धारणा । नाना उपासना नाना मंत्र ॥३॥
एक ते संगती पंचमुद्रा जप । एंव खटाटोप आसनाचा ॥४॥
एक ते सांगती तीर्थे तपे व्रत । एक ते अनंत पूजाविधि ॥५॥
बहेणि म्हणे आता नव्हे स्थिर मन । जेथे तेथे गुण अविद्येचा ॥६॥

याच बहेणाबाई यातून सुटण्याचा मार्ग पण सांगतात.

माया हे सावेव किंवा निरावेव । न कळे याचे ठाव कोणेपरी ॥५॥
बहेणि म्हणे याचे कर्म कळावया । वोळंगावे पाया सद्गुरूच्या ॥६॥

सावेव— साकार
निरावेव -निराकार
ओळगणे: आश्रय घेणे

No comments:

Post a Comment