Wednesday, July 18, 2018

अभंगाची दिंडी - दिवस १४

संत एकनाथ महाराज
महाराज सद्‍गुरुंची लक्षण सांगत आहेत. गुरू व सद्‍गुरु यामध्ये फरक आहे. ज्याला अभिमान झाला किंवा जो ज्ञान पैशासाठी विकतो किंवा लंपट आहे अशा व्यक्तीला सद्‍गुरु म्हणता येणार नाही. मग "सद्‍गुरु कोण?" हे महाराज खालील अभंगात सांगतात.

शिष्ये करावे माझे भजन । ऐसे वांछी जरी गुरुचे मन ।
तो गुरुत्वा मुकला जाण । अभिमाने पूर्ण नागवला ॥
जगी दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान ।
ते जाण शिश्नोदरपरायण । तेथे अर्धक्षण ज्ञान न थारे ॥
मुख्यत्वे गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान ।
सर्वांगी शांतीचे भूषण । तो सद्‍गुरु पूर्ण परब्रह्म ॥

दाटुगा— श्रेष्ठ; मोठा.
शिश्नोदरपरायण- लंपट 

No comments:

Post a Comment