Friday, July 13, 2018

अभंगाची दिंडी - दिवस ९

संत तुकाराम महाराज

महाराज लीन असण्याचे फायदे सांगत आहेत. धातू भट्टीमध्ये लीन होतो व अशुद्धतेचा नाश होतो. नदीला पुर आल्यावर मोठमोठी झाडे उन्मळून पडतात पण लवाळ मात्र टिकून राहते. हत्ती (शत्रूची) माणसं तुडवतो पण तो मुंगीला तुडवू शकत नाही. हातोडीचे घाव हिरा सोसतो. गारा थोड्याच असे घाव सोसू शकणार आहेत?
तुकोबांची उदाहरणे परस्पर विरोधी वाटत असली तरी लीन, दीन व सहनशील व्यक्तीच भवसागर पार करून जाऊ शकतील, ज्यांच्या डोक्यावर अहंमपणाचा भार आहे ते मात्र नक्कीच बुडतील.

अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अतु । होय शुद्ध न पवे घातु । पटतंतुप्रमाण ॥१॥
बाह्यरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अज्ञान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥
पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥२॥
हस्ती परदळ तें भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयेच्या ॥३॥
पिटितां घणें वरि सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥४॥
लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार । बुडे माथां भार । तुका म्हणें वाहोनि ॥५॥
                                                                                                                                (गाथा)
घातु: नाश; नासाडी; विध्वंस
भंगी: भंगणे
पाणोवाणी: पाठोपाठ
सैरा: नीट; चांगलें; सरळ

No comments:

Post a Comment