गेले तीन चार वर्ष मी आणी माझे काही मित्र ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी बरोबर पुणे ते दिवेघाट जवळ जवळ २६ कि.मी. जातो. पहिल्या वर्षी आम्ही दिवे घाट पायथ्या पर्यंत गेलो आणि तेथुन कानिफनाथाचा डोंगर चढलो थोडासा त्रासदायकच होत पण आम्ही ते अंतर चढुन जाऊ शकलो.
२५,२६ किमी नुसत चालण खंरच खुप आवघड आहे. पण या चार वर्षातील अनुभवावरुन नक्कीच म्हणता येईल की माऊलीच्या बरोबर चाललो म्हणजे त्रास कमी होतो. अनेक वयोवृध्द वारकरी टाळ मृंदुगाच्या तालावर नाचताना बघितल की आपण तरुण (त्याच्यापेक्षा) असुन सुध्दा आपण काय करतो!
आज पण मनात एक सुप्त (सुप्त कसली???) इच्छा आहे की पुर्ण वारी चालत करायची बघू माऊलीच्या मनात काय आहेते?
काल माझ्या बरोबर माझा एक दक्षिणेकडील (मराठीत south Indian) मित्र होता, त्याने मला विचारले "what do you mean by "maaULI"?" खंरतर फारच आवघड प्रश्न होता, मी म्हणालो "maaULi means mother" दुस-या मित्रान आणखीन व्याख्या चांगली करत “Beloved mother who take care of children”. "माऊली" या शब्दाचा अर्थ समजुन सांगण खरच खुप आवघड आहे पण समजुन घेणे तितकच सोप.
विट्टल तात्या
पुरुषोत्तम जतकर
ओटीवरती विट्टल तात्या टाळ कुटीत बसत असतं
कसं काय विट्टल तात्या म्हणता फक्त हसत असत
गळ्यामध्ये तुळशीमाळा कपाळाला नाम टिळा
अन् हसता हसता मध्येच एकदम मिचकवित एक डोळा
तसे त्यांच्यात पाप नव्हत जीवन अगदी निष्पाप होते
ओठवरचे खुले हास्य ते ही अगदी अमाप होते
सुखासाठी तात्या कधी ओटी सोडून गेले नाहीत
दुःखाचे डोंगर आले पण तात्या त्याला भ्यायले नाहीत
वारक-याला पहाताच क्षणी तात्या त्याच्या पाया पडत
खंर म्हणजे त्याच्यां वाचून त्यांचे काहीच नव्हते अडत
पण तो एक त्याचा भाव होता अंतरीचा ठाव होता
कारण पंढरीच्या वाटेवरच तात्यांचा गाव होता
पंढरीची पायी वारी नियम कधी मोडला नाही
भुकेलेल्या वारक-यास अन्नवाचुन सोडला नाही
एकदा त्यांनी पानामधलीच भिका-याला भाकर दिली
अन् उरली भुक पाणी पिऊन तेवढ्यावरच ढेकर दिली
तात्या आता वृध्द झाले हात पाय अगदीच थकले
पंढरीची वारी चुकेल म्हणून त्यांना आता दुःख झाले
आषाढीचा सोहळा आता तात्यांच्याच घरी भरतो
अन् पांडुरंग दिंडी घेऊन त्यांच्याच घरी वारी करतो
Friday, July 9, 2010
Thursday, June 24, 2010
जुनं ते सोनं
मला कायमच वाटत आपण फक्त जुनं ते सोनं असच म्हणत बसतो. माझ्यात पण हा दोष (का? गुण) आहे.
परवा एका वाहिनीवरुन (मराठीत channel) दुसरीकडं जाताना चुकुन दुरदर्शन लागल. कार्यक्रम होता चित्रहार. आणि मी परत माझ्या लहानपण्यातल्या टि.व्ही. कार्यक्रमात गेलो. चित्रहार मोजुन तिन गाणी, रंगोली रविवारी लवकर उठायच नसताना लवकर उठवणारा कार्यक्रम. चित्रगित मराठी गाण्याचा कार्यक्रम.
किती सुरेख होत जग! आज २४ तास गाण्याचे अनेक channels. पण एक तरी channel आपण अर्धातास बघतो का? संध्याकांळी कार्यक्रम सुरु होतानाचा दुरदर्शनचा लोगो. काय मस्त संगीत होत ते!
सुरभी, करमचंद, तहकिकात, गुल गुलशन गुलफाम, बुनियाद, रामायण,जंगलबुक कितीतरी नाव आजही पटकन सांगता येतात. पण सहा महिन्यापुर्वी संपलेल्या मालिकेच नाव आठवायला २ मिनिट लागतात.
मला पुर्वीचे कार्यक्रम तर सोडाच पण जहिराती पण आवडायच्या. "हमारा बजाज", "और मेरे लिये? पानपराग.", "निरमा", "कैलास जिवन" आणि आश्या कितीतरी आणि आज????????
फलटणला रामाचा रथ देवदिवाळीला निघतो. रथ ठेवायची जागा माझ्या घरापासुन जवळ असल्याने आम्हाला त्याचा अभिमान असायचा. गावात लाईटच वायंरीग रस्त्याच्या कडेने असायच. त्यामुळे रथ यायच्या वेळी लाईट बंद केली जायची. चुकुन रथ शनिवारी किंवा रविवारी आला तर मग चित्रपट चालू असताना लाईट जायची. किती मनस्ताप होयचा त्यावेळी. आज एकाच वेळीस अनेक सिनेमे बघतो, पण एकपण पुर्ण नाही.
मी माझ्या मुलाला नक्की सांगु शकेन "माझ्या लहानपणी टि.व्ही.वर काय कार्यक्रम असायचे! पण तो त्याच्या मुलांना काय सांगेल????"
शेवटी वपू म्हणतात तसं "आठवणी कुठल्या का असेनात त्या वाईटच. सुखाच्या असतील तर त्या वेळी असलेले सुख म्हणून दुःख, किंवा दुःखाच्या असतील तर ते भोगलेले दुःख"
परवा एका वाहिनीवरुन (मराठीत channel) दुसरीकडं जाताना चुकुन दुरदर्शन लागल. कार्यक्रम होता चित्रहार. आणि मी परत माझ्या लहानपण्यातल्या टि.व्ही. कार्यक्रमात गेलो. चित्रहार मोजुन तिन गाणी, रंगोली रविवारी लवकर उठायच नसताना लवकर उठवणारा कार्यक्रम. चित्रगित मराठी गाण्याचा कार्यक्रम.
किती सुरेख होत जग! आज २४ तास गाण्याचे अनेक channels. पण एक तरी channel आपण अर्धातास बघतो का? संध्याकांळी कार्यक्रम सुरु होतानाचा दुरदर्शनचा लोगो. काय मस्त संगीत होत ते!
सुरभी, करमचंद, तहकिकात, गुल गुलशन गुलफाम, बुनियाद, रामायण,जंगलबुक कितीतरी नाव आजही पटकन सांगता येतात. पण सहा महिन्यापुर्वी संपलेल्या मालिकेच नाव आठवायला २ मिनिट लागतात.
मला पुर्वीचे कार्यक्रम तर सोडाच पण जहिराती पण आवडायच्या. "हमारा बजाज", "और मेरे लिये? पानपराग.", "निरमा", "कैलास जिवन" आणि आश्या कितीतरी आणि आज????????
फलटणला रामाचा रथ देवदिवाळीला निघतो. रथ ठेवायची जागा माझ्या घरापासुन जवळ असल्याने आम्हाला त्याचा अभिमान असायचा. गावात लाईटच वायंरीग रस्त्याच्या कडेने असायच. त्यामुळे रथ यायच्या वेळी लाईट बंद केली जायची. चुकुन रथ शनिवारी किंवा रविवारी आला तर मग चित्रपट चालू असताना लाईट जायची. किती मनस्ताप होयचा त्यावेळी. आज एकाच वेळीस अनेक सिनेमे बघतो, पण एकपण पुर्ण नाही.
मी माझ्या मुलाला नक्की सांगु शकेन "माझ्या लहानपणी टि.व्ही.वर काय कार्यक्रम असायचे! पण तो त्याच्या मुलांना काय सांगेल????"
शेवटी वपू म्हणतात तसं "आठवणी कुठल्या का असेनात त्या वाईटच. सुखाच्या असतील तर त्या वेळी असलेले सुख म्हणून दुःख, किंवा दुःखाच्या असतील तर ते भोगलेले दुःख"
Monday, June 14, 2010
मत्सर
आज बरेच दिवसातून परत काही तरी लिहावस वाटल.
मागच्या महिन्यात मी घराच्या मंडळींबरोबर सहलीला (trip)गेलो होतो. पुर्ण सहली बद्दल लिहावस वाटत होत. पण जमलच नाही. म्हणुन काही किस्सेः
मला कायम दक्षिणेकडील राज्याच्या परिवहन मंडळाबाबत (मराठीत S.T.) हेवा (हेवा कसला मत्सरच) वाटायचा. किती कमी पैशात किती चांगली सेवा! आमच्या प्रवासात आम्ही श्रीशैलम् वरुन विजयवाडाला आंन्ध्रच्या S.T ने प्रवास केला. आम्हाला बसायला जागा होती आणि बस पण रिकामीच होती. हळूहळू बस भरत गेली. आणि अनेकजण उभे पण राहिले. माझ्या शेजारी एक स्त्री, तिची मुलगी आणि मुलगा आशे उभे होते. अचानक मुलगा खिडकी कडे धावला. लहानपणी मला पण गाडी लागायची, त्यामुळे पुढे काय होणार हे माझ्या लगेच लक्षात आल. पण मुलगा काही खिडकी पर्यत जाऊ शकला नाही. त्यांन उलटी करुन गाडी घाण केली.
त्या बाईन स्वःताच्या bag तुन एक त्या मुलाचा एक शर्ट काढला. सर्व घाण स्वच्छ केली. आणि तो शर्ट खिडकीतुन टाकून दिला.
त्यावेळी मी जर महाराष्ट्रात असतो तर काय झाल असत हाच विचार करत होतो.
आपणच केलेली घाण आपणच स्वच्छ करायला पाहिजे?!. हे प्रवासी, चालक वाहक आणि शासनकर्ते या सर्वानाच लगू होत असाव?!.
मागच्या महिन्यात मी घराच्या मंडळींबरोबर सहलीला (trip)गेलो होतो. पुर्ण सहली बद्दल लिहावस वाटत होत. पण जमलच नाही. म्हणुन काही किस्सेः
मला कायम दक्षिणेकडील राज्याच्या परिवहन मंडळाबाबत (मराठीत S.T.) हेवा (हेवा कसला मत्सरच) वाटायचा. किती कमी पैशात किती चांगली सेवा! आमच्या प्रवासात आम्ही श्रीशैलम् वरुन विजयवाडाला आंन्ध्रच्या S.T ने प्रवास केला. आम्हाला बसायला जागा होती आणि बस पण रिकामीच होती. हळूहळू बस भरत गेली. आणि अनेकजण उभे पण राहिले. माझ्या शेजारी एक स्त्री, तिची मुलगी आणि मुलगा आशे उभे होते. अचानक मुलगा खिडकी कडे धावला. लहानपणी मला पण गाडी लागायची, त्यामुळे पुढे काय होणार हे माझ्या लगेच लक्षात आल. पण मुलगा काही खिडकी पर्यत जाऊ शकला नाही. त्यांन उलटी करुन गाडी घाण केली.
त्या बाईन स्वःताच्या bag तुन एक त्या मुलाचा एक शर्ट काढला. सर्व घाण स्वच्छ केली. आणि तो शर्ट खिडकीतुन टाकून दिला.
त्यावेळी मी जर महाराष्ट्रात असतो तर काय झाल असत हाच विचार करत होतो.
आपणच केलेली घाण आपणच स्वच्छ करायला पाहिजे?!. हे प्रवासी, चालक वाहक आणि शासनकर्ते या सर्वानाच लगू होत असाव?!.
Friday, March 19, 2010
रुम ५२
पदवीत्तर (Post graduate) शिक्षणासाठी मी पुण्यात आलो. पुण्या घर असल्यामुळे वसतीगृहात (Hostel) राहण्याचा प्रश्र्नच आला नाही. पण २००२-२००४ यावेळेत पुणे विद्यापिठातील वसतीगृह निरीक्षक (Rector) पण मला Hostel वरचा विद्यार्थी समजत असावेत.
रुम ५२ हि विशेष आवडीची रुम. या रुमवरचे अनेक किस्से आहेत (चला ४,५ Blog तरी भरतील).
एप्रिल, मे महिन्यातील दिवस. परीक्षा चालू झाल्या होत्या. "तु रुम वर आलास म्हणजे सगळी मुल आभ्यास करतात. परीक्षाच्या काळात तु रुम वरच रहा" रुमवरचा मित्र. "बंर". उद्या पासुन पेपर सुरु होणार होत्ते. पहिला पेपर "Regression analysis". मी आदल्या दिवशीच रुमवर गेलो. दुपार पासुन सर्वानी अभ्यास पण सुरु केला. ७,८ वाजले असतील. जेवणाचे डब्बे येण्याची वेळ झाली. एका मित्राने पत्ते काढले व डाव लावत बसला. यथावकाश डब्बे पण आले. जेवण झाल्यावर परत अभ्यास सुरु करणार होतोच. पण मगाशी डाव लावणारा तो डाव पुर्ण करत होता. त्याला मदतीला दुसरा मित्र आला. मग डाव लावण्यापेक्षा रम्मी खेळलेली बरी. म्हणुन रम्मीचा डाव सुरु झाला. एकाला दोन, दोनाला तीन आशे सर्वजण बसले (मी सुध्दा). दुसरे दिवशी चहा नाष्टा कोण देणार हे ठरवण्यासाठी. रात्रीचे १२:३० वाजले असतील तेव्हा कुठे डाव संपला. मग सर्वानी लवकर उठुन अभ्यास करयच ठरवंल.
रात्रीचे तीन, साडेतीन वाजले असतील. एका मित्राच्या पोटात दुखाला लागल. त्यान शेजारच्याला उठवल. आणि हळुहळू रुम जागी झाली. त्याच्या पोटात पण भंयकर दुखत असणार. "नाही रे, उद्यापर्यत मी जिवंत राहत नाही" वगरै,वगरै आशी त्याची वाक्य चालू होतीच. सर्व उपाय जे आम्ही करु शकतो ते सर्व करुनही झाले. मित्राचा त्रास वाढतच चालला होता. मग कुणीतरी रिक्षा आणली. रात्री रिक्षा मिळण फार मुश्किल होत. त्याला रिक्षात घातल. कुण्याच्यातरी मागुन आणलेल्या दोन गाड्यावर चौघ. जवळच असण्यार्या रत्ना हॉस्पिटला आम्ही गेलो. डॉक्टरानी तपासल व दाखल करुन घेतल (admit). डॉक्टराना विचारल "काही सिरियस?" "काही नाही उद्या ठीक होईल". तो पर्यत सकाळचे ६ वाजले होते. त्या मित्राच्या आई वडिलाना बोलावल. ते पण घाबरुन ११,१२ पर्यत आले. तो पर्यत आम्ही तिथेच. अभ्यासाचाच उजेड. पण पेपर देयचा ठरवल होतच.
पेपर दिला पण. देवाच्या दयेने आम्हचे टमके बरोबर लागले व आम्ही पास पण झालो. दुसर्या दिवशी त्याला हॉस्पिटल मधुन सोडल पण.
रुम ५२ हि विशेष आवडीची रुम. या रुमवरचे अनेक किस्से आहेत (चला ४,५ Blog तरी भरतील).
एप्रिल, मे महिन्यातील दिवस. परीक्षा चालू झाल्या होत्या. "तु रुम वर आलास म्हणजे सगळी मुल आभ्यास करतात. परीक्षाच्या काळात तु रुम वरच रहा" रुमवरचा मित्र. "बंर". उद्या पासुन पेपर सुरु होणार होत्ते. पहिला पेपर "Regression analysis". मी आदल्या दिवशीच रुमवर गेलो. दुपार पासुन सर्वानी अभ्यास पण सुरु केला. ७,८ वाजले असतील. जेवणाचे डब्बे येण्याची वेळ झाली. एका मित्राने पत्ते काढले व डाव लावत बसला. यथावकाश डब्बे पण आले. जेवण झाल्यावर परत अभ्यास सुरु करणार होतोच. पण मगाशी डाव लावणारा तो डाव पुर्ण करत होता. त्याला मदतीला दुसरा मित्र आला. मग डाव लावण्यापेक्षा रम्मी खेळलेली बरी. म्हणुन रम्मीचा डाव सुरु झाला. एकाला दोन, दोनाला तीन आशे सर्वजण बसले (मी सुध्दा). दुसरे दिवशी चहा नाष्टा कोण देणार हे ठरवण्यासाठी. रात्रीचे १२:३० वाजले असतील तेव्हा कुठे डाव संपला. मग सर्वानी लवकर उठुन अभ्यास करयच ठरवंल.
रात्रीचे तीन, साडेतीन वाजले असतील. एका मित्राच्या पोटात दुखाला लागल. त्यान शेजारच्याला उठवल. आणि हळुहळू रुम जागी झाली. त्याच्या पोटात पण भंयकर दुखत असणार. "नाही रे, उद्यापर्यत मी जिवंत राहत नाही" वगरै,वगरै आशी त्याची वाक्य चालू होतीच. सर्व उपाय जे आम्ही करु शकतो ते सर्व करुनही झाले. मित्राचा त्रास वाढतच चालला होता. मग कुणीतरी रिक्षा आणली. रात्री रिक्षा मिळण फार मुश्किल होत. त्याला रिक्षात घातल. कुण्याच्यातरी मागुन आणलेल्या दोन गाड्यावर चौघ. जवळच असण्यार्या रत्ना हॉस्पिटला आम्ही गेलो. डॉक्टरानी तपासल व दाखल करुन घेतल (admit). डॉक्टराना विचारल "काही सिरियस?" "काही नाही उद्या ठीक होईल". तो पर्यत सकाळचे ६ वाजले होते. त्या मित्राच्या आई वडिलाना बोलावल. ते पण घाबरुन ११,१२ पर्यत आले. तो पर्यत आम्ही तिथेच. अभ्यासाचाच उजेड. पण पेपर देयचा ठरवल होतच.
पेपर दिला पण. देवाच्या दयेने आम्हचे टमके बरोबर लागले व आम्ही पास पण झालो. दुसर्या दिवशी त्याला हॉस्पिटल मधुन सोडल पण.
Thursday, March 11, 2010
आणि आम्ही परत फिरलो
आणि आम्ही परत फिरलो
मी त्यावेळी खुपच लहान होतो. माझे आते भाऊ आणि बहिण आमच्याकडे राहला आले होते. ते आले कि दिवस मजेत जायचे. पण ते जायचे त्या दिवशी भंयकर त्रास व्हायचा. आशेच एका दिवशी ते जायला निघाले.
आम्हच्याकडे येण्यार्या पाहुण्याना जाताना बस स्थानकावर (मराठीत stand वर)पोहचवण्याची पध्दत होती आणि आहे. त्यामुळे पाहुणे मंडळीबरोबर घरच्या मंडळीचा पण टांगा ( इतिहास जमा झालेल वाहन) जायचा.
एका टांग्यात माझी आजी, आत्या, भाऊ वगरै जात होते. काय झाल माहित नाही बहुदा दगडावरुन टांगा गेला असणार आणि टांगा पलटला.
सर्वानाच थोडफार लागल. पण आजीला जरा जास्तच लागल. एक दोन टाके पण पडले. आशा अवस्थेत जाण आत्याला बरं वाटना. म्हणुन आत्यानी ठरल दोन चार दिवसानी जाऊ. आणि आम्ही परत फिरलो.
आजीला लागल होत डॉक्टर तपासत होते आणि आम्ही मुल नाचत होत कारण जाण दोन दिवसानी लांबल.
त्याकाळात आजीला लागल असताना असा आंनद व्यक्त करण बंर नाही हे कळतच नव्हत.
आज?????????????????????
मी त्यावेळी खुपच लहान होतो. माझे आते भाऊ आणि बहिण आमच्याकडे राहला आले होते. ते आले कि दिवस मजेत जायचे. पण ते जायचे त्या दिवशी भंयकर त्रास व्हायचा. आशेच एका दिवशी ते जायला निघाले.
आम्हच्याकडे येण्यार्या पाहुण्याना जाताना बस स्थानकावर (मराठीत stand वर)पोहचवण्याची पध्दत होती आणि आहे. त्यामुळे पाहुणे मंडळीबरोबर घरच्या मंडळीचा पण टांगा ( इतिहास जमा झालेल वाहन) जायचा.
एका टांग्यात माझी आजी, आत्या, भाऊ वगरै जात होते. काय झाल माहित नाही बहुदा दगडावरुन टांगा गेला असणार आणि टांगा पलटला.
सर्वानाच थोडफार लागल. पण आजीला जरा जास्तच लागल. एक दोन टाके पण पडले. आशा अवस्थेत जाण आत्याला बरं वाटना. म्हणुन आत्यानी ठरल दोन चार दिवसानी जाऊ. आणि आम्ही परत फिरलो.
आजीला लागल होत डॉक्टर तपासत होते आणि आम्ही मुल नाचत होत कारण जाण दोन दिवसानी लांबल.
त्याकाळात आजीला लागल असताना असा आंनद व्यक्त करण बंर नाही हे कळतच नव्हत.
आज?????????????????????
Monday, March 8, 2010
रंगपंचमी
परवा रंगपंचमी झाली. सोसायटीतील लोकांनी साजरी पण केली. ४००,५०० रुपयाचा रंग हि असेल. पण ती मज्जा नाही आली जी पुर्वी येत असे. ४,५ रुपायाचा रंग असे पण मज्जा ४,५ लाखाची असायची?
माझी आजी नेहमी म्हणायची "माझी मुल हिच माझी दैवत" आणि खंरच आजीनं मुलाची (माझ्या वडीलाची, आत्याची) खुप काळजी घेतली आणि केली पण. तसच त्याच्यावर चांगले संस्कार होतील याच्यावर पण लक्ष्य ठेवले.
रंगपंचमी वरून आठवल. माझ्या वडीलाच्या लहानपणी आजी रंगपंचमीसाठी गरम पाणी करुन द्यायची. आज रंग खेळण्यासाठी "गरम पाणी" वाचुन थोडस हासू पण येईल पण आजीचा दृष्टीकोन फारच सरळ होता. "गार पाण्यामुळे मुलाना काही त्रास होऊ नये. मुल आजारी पडू नये"
यापुढे जाऊन हि आणखी एक गंमत म्हणजे, हे गरम पाणी माझे वडील किंवा आत्या इतर मुलाच्या आंगावर उडवत आणि ती मुल मात्र यांच्या आंगावर गार पाणी उडवत. आजी म्हणायची माझी मुल काय आणि इतराची काय त्रास कोणालाही होऊ नये.
हेच संस्कार आजही जपायचे प्रयत्न करतो आहे. दुसरा आपल्यावर गारपाणी उडवत असला तरी आपण गरमपाणी उडवायच.
माझी आजी नेहमी म्हणायची "माझी मुल हिच माझी दैवत" आणि खंरच आजीनं मुलाची (माझ्या वडीलाची, आत्याची) खुप काळजी घेतली आणि केली पण. तसच त्याच्यावर चांगले संस्कार होतील याच्यावर पण लक्ष्य ठेवले.
रंगपंचमी वरून आठवल. माझ्या वडीलाच्या लहानपणी आजी रंगपंचमीसाठी गरम पाणी करुन द्यायची. आज रंग खेळण्यासाठी "गरम पाणी" वाचुन थोडस हासू पण येईल पण आजीचा दृष्टीकोन फारच सरळ होता. "गार पाण्यामुळे मुलाना काही त्रास होऊ नये. मुल आजारी पडू नये"
यापुढे जाऊन हि आणखी एक गंमत म्हणजे, हे गरम पाणी माझे वडील किंवा आत्या इतर मुलाच्या आंगावर उडवत आणि ती मुल मात्र यांच्या आंगावर गार पाणी उडवत. आजी म्हणायची माझी मुल काय आणि इतराची काय त्रास कोणालाही होऊ नये.
हेच संस्कार आजही जपायचे प्रयत्न करतो आहे. दुसरा आपल्यावर गारपाणी उडवत असला तरी आपण गरमपाणी उडवायच.
Tuesday, March 2, 2010
बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय
मी त्यावेळी साधारण आठवीत होतो. रसायनशास्त्राच्या सुरवातीच्या धड्यात किमयागार नाईल नदी वैगरे माहिती होती. किमयागाराना परीस, अस द्रव्य ज्या मध्ये सर्व पदार्थ वितळतील अश्या काहिश्या वस्तू तयार करायच्या होत्या म्हणे. त्यावरुन आम्ही ४,५ मित्र फारच प्रेरित (Inspire) झालो. आम्ही आठवीत असल्यामुळे आम्हाला प्रयोगशाळेत जाता येत नसे. परंतू एका दुसर्या शाळेच्या प्रयोगशाळेत आम्ही जाऊ शकत होतो. एक दिवस आम्ही त्या शाळेच्या प्रयोगशाळेत गेलो. ज्या पदार्थाची नावे माहित होती ते पदार्थ आम्ही थोडे थोडे वेगवेगळ्या पिशवीत घेतले ( का चोरले?????). एका मित्राने एक bag (मराठीत काय?????) आणलीच होती त्यामध्ये या सर्व गोष्टी त्यामध्ये ठेवल्या. दुसर्या दिवसा पासुन प्रयोगाला सुरवात पण केली. आमच्या घराच मागचं अंगण हिच आमची प्रयोगशाळा. आम्हाला नक्की वाटत होत की आम्ही दोन चार दिवसात आम्ही नक्कीच कशाचा तरी शोध लावू.
असाच किस्सा कॉलेजचा. संख्याशात्रात Distribution (मराठीत काय??????) असतात. थोडे दिवस संख्याशात्राचा अभ्यास केल्यावर लक्षात आल आपण पण आपल्या नावान एक Distribution काढू शकतो. Kalyan's distribution.
आज जाणवत दोन्ही गोष्टीत मनाचा बालिशपणा होता.
आपला पगार किती टक्क्यानी वाढला? कोणत रेटींग मिळाल? पदोनत्ती(Promotion) झाली का नाही? हे जरी आज यक्षप्रश्न वाटत असले तरी काही दिवसानी हा पण बालिशपणाच वाटेल?
बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय मला वाटत यामध्ये फारच अंधुक रेषा आहे?
असाच किस्सा कॉलेजचा. संख्याशात्रात Distribution (मराठीत काय??????) असतात. थोडे दिवस संख्याशात्राचा अभ्यास केल्यावर लक्षात आल आपण पण आपल्या नावान एक Distribution काढू शकतो. Kalyan's distribution.
आज जाणवत दोन्ही गोष्टीत मनाचा बालिशपणा होता.
आपला पगार किती टक्क्यानी वाढला? कोणत रेटींग मिळाल? पदोनत्ती(Promotion) झाली का नाही? हे जरी आज यक्षप्रश्न वाटत असले तरी काही दिवसानी हा पण बालिशपणाच वाटेल?
बालिशपणा, स्वप्न आणि ध्येय मला वाटत यामध्ये फारच अंधुक रेषा आहे?
Subscribe to:
Posts (Atom)